शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

सोनिया गांधींकडून देशाची दिशाभूल

By admin | Updated: March 30, 2015 23:25 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकासंबंधी आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकासंबंधी आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या धोरणामुळेच देशात बेरोजगारी निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोपही गडकरी यांनी केला.वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गडकरी हे सोनिया गांधी यांच्या पत्राला उत्तर देताना म्हणाले की, भूसंपादन कायद्यांतर्गत एक एकर जमीनही ताब्यात घेण्यात आलेली नाही. हा कायदा संपुआ सरकारने जलसिंचन, तसेच ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी आणलेला होता. शेतकरी सर्व काळ पावसावरच निर्भर असतात. सोनिया गांधी यांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात रालोआ सरकारने भूसंपादन कायदा एकतर्फीरीत्या लादला असून ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप केला होता. सरकार शेतकरीविरोधी असून उद्योगपतींच्या भल्यासाठीच ते झुकले आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. खुली चर्चा व्हावी लोकशाहीत कल्याण योजनांबाबत खुली चर्चा व्हायला हवी. लोकांनी अशा चर्चेपासून दूर जायला नको, असेही सांगत गडकरींनी सोनियांना दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचे स्मरण करवून दिले. एखादा प्रकल्प पाच वर्षांत अस्तित्वात न आल्यास जमीन मूळ मालकाला देण्याची तरतूद नसल्याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले होते. उत्तरात गडकरी म्हणाले की, अशा योजनांमुळे सिंचन आणि गृहनिर्माणासारख्या योजनांना बाधा पोहोचेल. जलसिंचन आणि गरिबांसाठी घरांसारख्या योजना पाच वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याने ही अट काढून टाकली जावी, अशी सूचना महाराष्ट्र आणि हरियाणातील तत्कालीन काँग्रेस सरकारांनी केली होती.संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गावांना वीज आणि शेतीला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले. संपुआ सरकारने रस्ते, वीज, सिंचन प्रकल्पांसाठी असलेला पैसा मतदारांना आमिष दाखविणाऱ्या लोकप्रिय योजनांवरच खर्च केल्याचा दावा यापूर्वीच्या योजना आयोगाने केला असल्याचा उल्लेखही गडकरींनी केला.