शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सोनिया गांधींकडून देशाची दिशाभूल

By admin | Updated: March 30, 2015 23:25 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकासंबंधी आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकासंबंधी आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या धोरणामुळेच देशात बेरोजगारी निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोपही गडकरी यांनी केला.वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गडकरी हे सोनिया गांधी यांच्या पत्राला उत्तर देताना म्हणाले की, भूसंपादन कायद्यांतर्गत एक एकर जमीनही ताब्यात घेण्यात आलेली नाही. हा कायदा संपुआ सरकारने जलसिंचन, तसेच ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी आणलेला होता. शेतकरी सर्व काळ पावसावरच निर्भर असतात. सोनिया गांधी यांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात रालोआ सरकारने भूसंपादन कायदा एकतर्फीरीत्या लादला असून ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप केला होता. सरकार शेतकरीविरोधी असून उद्योगपतींच्या भल्यासाठीच ते झुकले आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. खुली चर्चा व्हावी लोकशाहीत कल्याण योजनांबाबत खुली चर्चा व्हायला हवी. लोकांनी अशा चर्चेपासून दूर जायला नको, असेही सांगत गडकरींनी सोनियांना दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचे स्मरण करवून दिले. एखादा प्रकल्प पाच वर्षांत अस्तित्वात न आल्यास जमीन मूळ मालकाला देण्याची तरतूद नसल्याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले होते. उत्तरात गडकरी म्हणाले की, अशा योजनांमुळे सिंचन आणि गृहनिर्माणासारख्या योजनांना बाधा पोहोचेल. जलसिंचन आणि गरिबांसाठी घरांसारख्या योजना पाच वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याने ही अट काढून टाकली जावी, अशी सूचना महाराष्ट्र आणि हरियाणातील तत्कालीन काँग्रेस सरकारांनी केली होती.संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गावांना वीज आणि शेतीला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले. संपुआ सरकारने रस्ते, वीज, सिंचन प्रकल्पांसाठी असलेला पैसा मतदारांना आमिष दाखविणाऱ्या लोकप्रिय योजनांवरच खर्च केल्याचा दावा यापूर्वीच्या योजना आयोगाने केला असल्याचा उल्लेखही गडकरींनी केला.