शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

देशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:28 IST

दरवर्षी धान्याची नासाडी : माहिती अधिकारातून झाले उघड

नवी दिल्ली : भारतात किमान २0 कोटी लोकांना अन्नावाचून एक तर उपाशी राहावे लागते अथवा अर्धपोटी भोजनावर दिवस काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५00 ग्रॅम अन्नाची गरज आहे. पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे रोज ८२१ बालकांचा मृत्यू होतो.

हे विदारक चित्र एकीकडे आहे तर सरकारी बेपर्वाईमुळे गेल्या १0 वर्षांत गोदामांमधील ७.८0 लाख क्विंटल धान्य सडून वाया गेल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ असा की रोज सरासरी ४३ हजार लोकांच्या वाट्याचे अन्न सडल्यामुळे वाया गेले. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे हे सत्य समोर आले आहे.

खाद्यान्न विशेषज्ञांच्या मते मुख्यत्वे पावसात भिजल्यामुळे दहा वर्षांत सरकारी अथवा गैरसरकारी गोदामांमधील धान्य सडून गेले. उपलब्ध आकडेवारीनुसार यूपीए सरकारच्या ६ वर्षांच्या कालखंडात ४.४२ लाख क्विंटल धान्य सडले, तर मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात ३.३८ लाख क्विंटल धान्य सडल्याची माहिती आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान म्हणतात की, ४ वर्षांत धान्य खराब होण्याचे प्रमाण घटले, याचे कारण धान्य सडू नये, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. यंदा किती नासाडीभारतात साधारणत: २३७.४0 कोटी क्विंटल धान्योत्पादन प्रतिवर्षी होते. त्यातील सरासरी १२.६४ कोटी क्विंटल धान्य शेतातून गोदामात पोहोचेपर्यंत खराब होऊन जाते. यंदा सप्टेंबरपर्यंत ४६४0 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.पश्चिम बंगालमध्ये सडले सर्वाधिक अन्नधान्यराज्य            सडलेले अन्नधान्यप. बंगाल     १ लाख ५४ हजार ८१0 क्विंटलबिहार          ८२ हजार १0 क्विंटलपंजाब          ३२ हजार ८00 क्विंटलउत्तर प्रदेश    २४ हजार ४९0 क्विंटलउत्तराखंड      ३४ हजार ५८0 क्विंटलझारखंड      ७ हजार ८९0 क्विंटलदिल्ली         १३७0 क्विंटल

टॅग्स :foodअन्न