शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

देशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:28 IST

दरवर्षी धान्याची नासाडी : माहिती अधिकारातून झाले उघड

नवी दिल्ली : भारतात किमान २0 कोटी लोकांना अन्नावाचून एक तर उपाशी राहावे लागते अथवा अर्धपोटी भोजनावर दिवस काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५00 ग्रॅम अन्नाची गरज आहे. पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे रोज ८२१ बालकांचा मृत्यू होतो.

हे विदारक चित्र एकीकडे आहे तर सरकारी बेपर्वाईमुळे गेल्या १0 वर्षांत गोदामांमधील ७.८0 लाख क्विंटल धान्य सडून वाया गेल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ असा की रोज सरासरी ४३ हजार लोकांच्या वाट्याचे अन्न सडल्यामुळे वाया गेले. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे हे सत्य समोर आले आहे.

खाद्यान्न विशेषज्ञांच्या मते मुख्यत्वे पावसात भिजल्यामुळे दहा वर्षांत सरकारी अथवा गैरसरकारी गोदामांमधील धान्य सडून गेले. उपलब्ध आकडेवारीनुसार यूपीए सरकारच्या ६ वर्षांच्या कालखंडात ४.४२ लाख क्विंटल धान्य सडले, तर मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात ३.३८ लाख क्विंटल धान्य सडल्याची माहिती आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान म्हणतात की, ४ वर्षांत धान्य खराब होण्याचे प्रमाण घटले, याचे कारण धान्य सडू नये, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. यंदा किती नासाडीभारतात साधारणत: २३७.४0 कोटी क्विंटल धान्योत्पादन प्रतिवर्षी होते. त्यातील सरासरी १२.६४ कोटी क्विंटल धान्य शेतातून गोदामात पोहोचेपर्यंत खराब होऊन जाते. यंदा सप्टेंबरपर्यंत ४६४0 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.पश्चिम बंगालमध्ये सडले सर्वाधिक अन्नधान्यराज्य            सडलेले अन्नधान्यप. बंगाल     १ लाख ५४ हजार ८१0 क्विंटलबिहार          ८२ हजार १0 क्विंटलपंजाब          ३२ हजार ८00 क्विंटलउत्तर प्रदेश    २४ हजार ४९0 क्विंटलउत्तराखंड      ३४ हजार ५८0 क्विंटलझारखंड      ७ हजार ८९0 क्विंटलदिल्ली         १३७0 क्विंटल

टॅग्स :foodअन्न