शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांची 6 महिन्यांत चौकशी होणार पूर्ण

By admin | Updated: June 6, 2017 08:57 IST

भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराविरोधात तीव्र लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सरकारी विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराविरोधात तीव्र लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सरकारी विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारनं 50 वर्ष जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करत सरकारी कर्मचा-यांविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी 6 महिन्यांत पूर्ण करण्याची नवीन मुदत ठरवली आहे.  
 
भ्रष्टाचार प्रकरणांत चौकशीमध्ये गती आणण्याच्या उद्देशानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणातील कित्येक खटले ब-याच कालावधीपासून अद्यापही प्रलंबित आहेत. संबंधित कायद्यामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी 6 महिन्यांमध्ये पूर्ण करुन त्याचा अहवाल संबंधितांकडे सोपवला जाणार आहे. 
 
यापूर्वी भ्रष्टाचारसंबंधी आरोपांची चौकशी पूर्ण करण्यासाठी कोणताही निश्चित असा कालावधी ठरवून देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे वर्षानुवर्ष खटले सुरू राहतात. दरम्यान, हा नवीन कायदा अखिल भारतीय सेवा (भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा) आणि अन्य काही श्रेणीतील अधिका-यांव्यतिरिक्त अन्य सर्व श्रेणीतील कर्मचा-यांना लागू होतो.
 
काही दिवसांपूर्वी केंद्रीय दक्षता आयोगानं (CVC) सार्वजनिक क्षेत्रातील बँक,  विमा कंपनी आणि केंद्र सरकारमधील निरनिराळ्या विभागांना सांगितले होते की, भष्ट्राचारसंबंधीत प्रलंबित प्रकरणाच्या चौकशीमध्ये गती आणावी. भ्रष्टाचारविरोधी पथकांनी सर्व विभागांच्या मुख्य अधिका-यांना लेखी स्वरुपात तक्रारांची चौकशी जलत गतीनं करण्यास सांगितले आहे.
 
सीव्हीसीकडून सरकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराची तक्रारांची चौकशी व अहवालासाठी संबंधित सीव्हीओंना पाठवलं जातं.
उल्लेखनीय बाब म्हणजे वर्ष 2015च्या तुलनेत वर्ष 2016मध्ये निरनिराळ्या विभागांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये 67 टक्के वाढ झाली आहे आणि या यादीत रेल्वे विभाग शीर्षस्थानी आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या एक अहवालानुसार 2016 मध्ये भ्रष्टाराच्या 49,847 तक्रारी मिळाल्या होत्या, तर 2015मध्ये 29,838 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.