शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

आत्मपरीक्षण करून चुका सुधारू - केजरीवाल

By admin | Updated: April 30, 2017 00:50 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी चुकांची कबुली दिली. आम्ही चुकलो आहोत; पण पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त करू, असे त्यांनी म्हटले आहे.दिल्ली महानगरपालिकेतील आपच्या पराभवास मतदान यंत्रांतील घोळ जबाबदार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता; मात्र आपचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनीच त्यांच्या या वक्तव्यास विरोध केला होता. पक्षाच्या कार्यपद्धतीवरही विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करून चुकांची कबुली दिली. अशा प्रकारे चुकांची कबुली देणे ही भारतीय राजकारणात दुर्मिळ बाब समजली जात आहे.केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बोललो आहे. सत्य परखड आहे. होय, आम्ही चुका केल्या आहेत; मात्र आम्ही आत्मपरीक्षण करून चुकांची दुरुस्ती करू. बदल न करणे मूर्खपणाचे ठरेल.’केजरीवाल यांनी म्हटले की, ‘आम्ही मतदार आणि कार्यकर्त्यांचे देणे लागतो. आम्ही स्वत:चेही देणे लागतो. आता सबबी सांगणे नव्हे, तर कृती करणे गरजेचे आहे. कामावर परतण्याची ही वेळ आहे. आम्ही वेळोवेळी घसरत असलो तरी पकड शोधून स्वत:ला वर उठविणे महत्त्वाचे आहे. लोक उणिवांसाठी अजिबात पात्र नाहीत. बदल हीच कायम टिकणारी गोष्ट आहे.’पंजाब आणि गोव्यातील पराभवानंतर आपल्या अंगणात म्हणजेच दिल्लीतच आपला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोनच वर्षांपूर्वी आपने दिल्ली विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकली होती; पण आता आपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे.