शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाचे सावट; स्वातंत्र्य दिन सोहळा यंदा असेल ‘आटोपशीर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:40 IST

मोदींच्या भाषणात आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय हेल्थ कार्ड, कोरोनापासून स्वातंत्र्य यावर असेल भर

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्या सहभागी झालेले महंत नृत्यगोपालदास यांना कोरोनाची लागण झाल्याचे सावट दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरही पडले आहे. पाच ऑगस्ट रोजी महंत नृत्यगोपालदास यांच्या थेट संपर्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. ही स्थिती लक्षात घेऊन स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला लागलेल्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाचा सोहळ््याचे स्वरुप यंदा आटोपशीर असेल.यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बिगरकाँग्रेसी पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी सर्वाधिक काळ त्या पदावर विराजमान होते. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षी तो विक्रम मोडणार आहेत. तसेच या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत व राष्ट्रीय हेल्थ कार्ड या दोन गोष्टींवर आपल्या भाषणात भर देणार असल्याचे कळते.संचलनातील सैनिकांसाठी खास व्यवस्थास्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पूर्वतयारीमध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय), दिल्ली जल महामंडळ, दिल्ली पोलीस, केंद्र तसेच राज्य सरकार आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात. त्याशिवाय भूदल, नौदल, वायूदलाचे जवान पंतप्रधानांच्या जवळपास असतात. सूत्रांनी सांगितले की, तीनही सेनादलांचे जे जवान स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत, त्यांना काही दिवसांपूवीर्पासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. या जवानांसाठी जेवण बनविणारे, त्यांच्या गाड्यांचे चालक, सहाय्यक तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या संचलनात सहभागी होणाºया जवानांना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होता कामा नये, तसेच त्यांच्यामुळे पंतप्रधान व अन्य मान्यवर व्यक्तींनाही बाधा होऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. तसेच या जवानांसाठी असलेल्या गाड्याही सॅनिटाइझ केल्या जात आहेत.कोरोना साथीमुळे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या आयोजनात काही बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जवळच्या अंतरावर बसणाऱ्या व्हीव्हीआयपींची आसनव्यवस्था यावर्षी मुख्य व्यासपीठाला लागून असलेल्या उद्यानामध्ये करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग नीट राखले याची काळजी घेऊनच ही व्यवस्था करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रत्येक व्यक्ती १० फुट अंतर दूर राहिल अशाच पद्धतीने स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी या सोहळ्या एक हजार जणांना निमंत्रण देण्यात येते. पण यंदा दीड हजार कोरोना योद्धे उपस्थित राहाणार आहेत.

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाच्या वेळेत कपातस्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये अ‍ॅटहोम हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. पण यंदा त्यावरही कोरोनाचे सावट आहे. तिथे १५०० ऐवजी फक्त १०० पाहुण्यांनाच बोलाविण्यात आले आहे. अडीच तासाच्या या कार्यक्रमाची वेळ आता दीड तासांवर आणण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात १० प्रमुख मंत्री, १० प्रमुख देशांचे राजदूत व सरन्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच काही आणखी न्यायाधीश सहभागी होतील. तसेच वयोवृद्धांना कोरोना संसगार्पासून मोठा धोका असल्याने यंदा स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच मंत्रिमंडळ सचिवांसहित आणखी काही सनदी अधिकारी यावेळी उपस्थित राहातील. पण त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय असणार नाहीत.

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाच्या वेळेत कपातस्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये अ‍ॅटहोम हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. पण यंदा त्यावरही कोरोनाचे सावट आहे. तिथे फक्त १०० पाहुण्यांनाच बोलाविण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ आता दीड तासांवर आणण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात १० प्रमुख मंत्री, १० प्रमुख देशांचे राजदूत व सरन्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच काही आणखी न्यायाधीश सहभागी होतील.तसेच वयोवृद्धांना कोरोना संसगार्पासून मोठा धोका असल्याने यंदा स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच मंत्रिमंडळ सचिवांसहित आणखी काही सनदी अधिकारी यावेळी उपस्थित राहातील. पण त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय असणार नाहीत.

संचलनातील सैनिकांसाठी खास व्यवस्थास्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पूर्वतयारीमध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय), दिल्ली जल महामंडळ, दिल्ली पोलीस, केंद्र तसेच राज्य सरकार आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात. त्याशिवाय भूदल, नौदल, वायूदलाचे जवान पंतप्रधानांच्या जवळपास असतात.ते सर्व जवान क्वारंटाइनतीनही सेनादलांचे जे जवान सोहळ्यात सहभागी होणार आहेत, त्यांना काही दिवसांपूर्वीपासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. या जवानांसाठी जेवण बनविणारे, त्यांच्या गाड्यांचे चालक, सहाय्यक तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.या जवानांना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होता कामा नये, तसेच त्यांच्यामुळे पंतप्रधान व अन्य मान्यवर व्यक्तींनाही बाधा होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. तसेच या जवानांसाठी असलेल्या गाड्याही सॅनिटाइझ केल्या जात आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या