शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

coronavirus: दु:खाचा डोंगर कोसळलाय तरी... मुलाच्या 'तेराव्या'ला २००० मास्क वाटणार 'माऊली' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 19:53 IST

कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे

मुंबई - राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात एकीकडे दिलासादायक आकडेवारी आलेली असताना दुसरीकडे दिवसभरात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाशी अजून काही दिवस आपला लढा चालणार आहे. या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देतंय. 

कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची श्रद्धास्थान असलेली मंदिरे, मशिदी, चर्चा, गुरुद्वारे आणि इतर प्रार्थनास्थळही बंद करण्यात आली आहे. मनुष्य प्राण्याला एका महाभयंकर रोगापासून वाचविण्यासाठी माणूसच कामाला लागला आहे. बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भितीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्या खांद्यावर त्यांचं प्रेय स्मशानभूमीत घेऊ जाताना... राम नाम सत्य है.. असा रामनामाचा जपही या मुस्लीम बांधवांनी केला. एकीकडे माणूसकीचं हे उदाहरण असताना, दुसरीकडे आपल्या २५ वर्षीय मुलाच्या निधनाचे दु:ख विसरुन एक आई मुलाच्या तेराव्याला मास्कचे वाटप करणार आहे. 

कोरोनाच्या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे, कुठे या संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेऊन मास्कची साठेबाजी करणारे समाजकंट आहेत. तर, दुसरीकडे आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख सोबत घेऊन मास्क मोफत वाटणारी आई आहे. कुल्लू येथील एका कुटुंबीयांनी माणूसकीचा पाठ शिकवला आहे. बंजार उपमंडलच्या खुंदन गावात राहणारे हे कुटुंब कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गुमानसिंह आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका हरा देवी रविवारी आपल्या मुलाचा तेरावा घालत आहेत. मात्र, या तेराव्याच्या कार्यक्रमाला जेवण किंवा इतर विधी न करता, याकामी होणारा खर्च गरजूंना आणि गावातील लोकांना २००० मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. परिस्थिती आणि सामाजिक भान ठेऊन या माता-पित्यानं हे दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेश