शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Corona vaccine: भारतीयांना दिले त्यापेक्षा अधिक डाेस परदेशात पाठविले; सरकारची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 07:10 IST

संयुक्त राष्ट्र : ७० हून अधिक देशांना पुरविली लस

संयुक्त राष्ट्र/नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना काेराेना लसींचे जेवढे डाेस दिले त्यापेक्षा अधिक डाेस इतर देशांना पुरविल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिली आहे. लस पुरवठ्यातील असमानता कोराेना महामारीला राेखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पराभूत करेल, असा इशाराही भारताने दिला आहे. या असमानतेमुळे गरीब देशांवर सर्वात विपरीत परिणाम हाेतील, असे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांत भारताच्या राजदूतांचे उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी भारताच्या भूमिकेबाबत माहिती देताना सांगितले की, लसींच्या आव्हानावर ताेडगा निघाला आहे. आता लसींची उपलब्धता आणि पुरवठ्याचे आव्हान समाेर आहे. जागतिक पातळीवर सहकार्याचा अभाव आणि असमानतेचा गरीब देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा स्थितीतही भारत सहा महिन्यांमध्ये ३० काेटी आघाडीच्या काेराेना याेद्ध्यांचे लसीकरण करणार आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान ७० हून अधिक देशांना काेराेनाची लस पुरविली आहे. देशातील लसीकरणापेक्षा जास्त डाेस इतर देशांना पुरविल्याचे नायडू यांनी सांगितले. 

लस डिप्लाेमसीवरून टीकासरकारने लसींच्या निर्यातीपेक्षा भारतीय नागरिकांना प्राधान्य देऊन लसीकरण केले असते तर काेराेनाची दुसरी लाट राेखता आली असती, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा माेहम्मद यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या मुद्द्यावरून टीका केली आहे. या मुत्सद्दीपणाची भारताला किंमत माेजावी लागली असून, देशात कराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी या डाेसची मदत झाली हाेती, असे अब्दुल्ला म्हणाले. 

‘काेवॅक्स’ केंद्राला दाेन काेटी डाेसभारताकडून ‘गावी’ देशांच्या ‘काेवॅक्स’ केंद्राला लसीचे दाेन काेटी डाेस पुरविण्यात आले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता माेहिमांसाठी २ लाख काेराेना लसींचे डाेस पाठविण्यात आले आहेत. भारताच्या या पुढाकाराचे संयुक्त राष्ट्रांकडून आभार मानण्यात आले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस