शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Coronavirus: ‘कोरोनामुक्त’ भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे; १ एप्रिलपासून काय होणार बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 23:03 IST

भारताने निर्बंध हटवले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेण्यासाठी, सध्या कोविडची स्थिती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

नवी दिल्ली - एकीकडे भारत १ एप्रिल २०२२ पासून पुन्हा कोरोनामुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे २७ मार्चपासून चीनच्या शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. चीन सरकारने झिरो कोविड धोरण स्वीकारले आहे. ज्या अंतर्गत कोविडला देशातून पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, आकडेवारी पाहता कोरोनाचा नायनाट कुठल्या धोरणाने होईल हे सांगणे कठीण आहे. शून्य कोविड धोरण आणि कडक लॉकडाऊन असूनही, चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या भारतापेक्षा जास्त आहेत.

जगात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झाली घट

भारताने निर्बंध हटवले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेण्यासाठी, सध्या कोविडची स्थिती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या २९ टक्क्यांनी कमी झाली आहेत. अमेरिकेतही १५ टक्क्यांनी घट झाली आहे. युरोपमध्ये, कोरोना विषाणूची नवीन रुग्ण गेल्या आठवड्यापेक्षा ४% कमी नोंदवली गेली आहेत. दक्षिणपूर्व आशियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत १४% घट झाली आहे.

बहुतेक लोक Omicron चे बळी

गेल्या एका आठवड्यात जगभरात ३ लाख ८२ हजारांहून अधिक कोरोना विषाणूच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्यापैकी ९९.७% रुग्ण ओमायक्रॉनचे होते आणि एक टक्क्यापेक्षा कमी डेल्टा व्हेरिएंटचे होते. म्हणजेच, सामान्यतः यावेळी प्रत्येकजण ओमायक्रॉनचा शिकार होत आहे. ज्या व्हेरिएंटला गंभीर मानलं जात नव्हतं.  भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होत आहेत आणि मृतांचा आकडाही नियंत्रणात आहे.

१ एप्रिलपासून बदल

गेल्या २४ तासांत भारतात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात जुन्या १७ मृत्यूंची भर पडली असून, त्यामुळे २४ तासांत एकूण २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. चीनमध्ये सध्या लॉकडाऊन स्थिती असताना भारतात १ एप्रिलपासून अनेक बदल होणार आहेत.

कॉलर ट्यून यापुढे ऐकू येणार नाही

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा १ एप्रिलपासून संपुष्टात येत आहे. म्हणजे आता कोरोनाची कॉलर-ट्यून वाजणार नाही. म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करता तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज आणि लसीकरणाचे महत्त्व सांगणारा आवाज ऐकू येणार नाही. आरोग्य मंत्रालयाने या सूचनांचे परिपत्रक सर्व दूरसंचार ऑपरेटरना पाठवले आहे.

महाराष्ट्रातही निर्बंध हटवले

गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत त्यामुळे  मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल. हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही. लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही. बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. सार्वजनिक ठिकाणं, मॉल, उद्याने याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही. गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता येणार आहे.

 ‘या एकाच सवयीने कोरोनापासून सुटका

आता दिल्लीत मास्क न घातल्याने दंड आकारले जाणार नाही. वैयक्तिक कारमध्ये मास्क घालण्याची सक्ती संपली आहे. यासोबतच मुंबईने मास्क घालण्याची अटही रद्द केली आहे. त्याबाबतचं पत्र मुंबई महापालिकेकडून पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे मास्क घालण्याची सक्ती नाही. २०० रुपये दंड रद्द करण्यात आला आहे. यासोबतच पश्चिम बंगालनेही मास्क घालण्यावरील बंदी हटवली आहे. तथापि, प्रत्येक राज्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टेसिंग राखणे आणि हात स्वच्छ करणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. परंतु कोणताही नियम अनिवार्य ठेवण्यात आलेला नाही. मात्र, एम्सच्या अहवालानुसार, हात धुण्याची आणि लोकांशी हस्तांदोलन न करण्याची सवय कायम ठेवली, तर अनेक आजार टाळता येऊ शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या