शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

राजधानीत कोरोनाचा हाहाकार, देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत, अशी आहे देशाची स्थिती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 22, 2020 18:35 IST

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देगेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सर्वाधिक पहायला मिळत आहे. येथे देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू नोंदवले जात आहेत. एवढेच नाही, तर काही फॅक्ट्स आणि नवा रिपोर्ट भविष्यातील भयावह परिस्थितीचा सायरण वाजवत आहे. गेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. 

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशभरात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे विचार केल्यास, कोरोनामुळे देशात प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. तर प्रत्येक 10वा रुग्ण दिल्लीतून आहे. आतापर्यंत दिल्लीत 8 हजार 270 जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या 24 तासांत येथे 45 हजारहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी 5879 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थात प्रत्येक 100 पैकी 13 लोक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत करोनाचे 39 हजार 741 रुग्ण सक्रिय आहेत. 

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा - 21 नोव्हेंबर-111 20 नोव्हेंबर- 11819 नोव्हेंबर- 9818 नोव्हेंबर-131 17 नोव्हेंबर- 9916 नोव्हेंबर-99

आयएलबीएस डायरेक्टर डॉक्टर एसके सरीन म्हणाले, मास्कवर 2000 रुपयांचा दंड म्हणजे काही दंड नाही. ही सायंस समजावण्याची पद्धत आहे, जे लोकांनी ऐकले नाही. प्रॉपर मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. खोकलल्याने, शिंकल्याने आणि मोठ्याने हसल्याने व्हायरस पसरतो. म्हणून मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. 

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

कशी आहे देशाची स्थिती -देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 45209 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 9095806वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 133227 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर