शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजधानीत कोरोनाचा हाहाकार, देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत, अशी आहे देशाची स्थिती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 22, 2020 18:35 IST

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देगेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सर्वाधिक पहायला मिळत आहे. येथे देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू नोंदवले जात आहेत. एवढेच नाही, तर काही फॅक्ट्स आणि नवा रिपोर्ट भविष्यातील भयावह परिस्थितीचा सायरण वाजवत आहे. गेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. 

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशभरात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे विचार केल्यास, कोरोनामुळे देशात प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. तर प्रत्येक 10वा रुग्ण दिल्लीतून आहे. आतापर्यंत दिल्लीत 8 हजार 270 जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या 24 तासांत येथे 45 हजारहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी 5879 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थात प्रत्येक 100 पैकी 13 लोक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत करोनाचे 39 हजार 741 रुग्ण सक्रिय आहेत. 

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा - 21 नोव्हेंबर-111 20 नोव्हेंबर- 11819 नोव्हेंबर- 9818 नोव्हेंबर-131 17 नोव्हेंबर- 9916 नोव्हेंबर-99

आयएलबीएस डायरेक्टर डॉक्टर एसके सरीन म्हणाले, मास्कवर 2000 रुपयांचा दंड म्हणजे काही दंड नाही. ही सायंस समजावण्याची पद्धत आहे, जे लोकांनी ऐकले नाही. प्रॉपर मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. खोकलल्याने, शिंकल्याने आणि मोठ्याने हसल्याने व्हायरस पसरतो. म्हणून मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. 

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

कशी आहे देशाची स्थिती -देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 45209 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 9095806वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 133227 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर