शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसविल्यावरून वाद, मोदींनी केले हस्तांदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 03:10 IST

राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

हरीश गुप्ता नवी दिल्ली: राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.दरम्यान, राहुल गांधी यांनी जागा किंवा रांगेबाबत मी चिंता करीत नाही, राष्ट्रपती भवनात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या ‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमातही मी जागेबाबत तमा बाळगली नव्हती, असे सांगत भाष्य टाळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १० आसियान देशांच्या प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या अ‍ॅट होम कार्यक्रमात राहुल गांधी यांना व्हीआयपींमध्ये दुस-या रांगेत स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री, खासदार, राजदूत आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गणराज्यदिनानिमित्त राष्ट्रपतींनी आयोजित केलेले चहापान यावेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पहिल्यांदाच आसियानचे दहा राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. गणराज्यदिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत बसले होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. सर्व पाहुण्यांना कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी मोबाईल फोन सोबत आणण्याची मुभा देण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या आवडीच्या व्हीआयपींचे मुक्तपणे फोटो आणि व्हिडिओ घेतले.

विशेष म्हणजे दरवर्षी यादीत वाढ होत असताना पाहुण्यांची संख्या यावेळी ३ हजारावरून १२०० वर आणण्यात आली होती. पाहुण्यांच्या गर्दीवर आवर घालणे अवघड होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाहुण्यांना भेटणे सहज शक्य व्हावे, या उद्देशाने यावेळी यादीत कपात करण्यात आली. विविध देशांचे राजदूत, पुरस्कारविजेते आणि खासदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंत्री आणि व्हीआयपींना मुख्य स्थळी प्रवेश देण्यात आला होता. पंतप्रधानांनी नेहमीच्या शैलीत पाहुण्यांना सेल्फी घेण्याला परवानगी दिली.स्वराज यांची अनुपस्थिती खटकली...राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या चहापानाला विदेश मंत्री सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. विविध देशांच्या राजदूतांना त्यांना भेटता आले नाही. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन व मंत्री पत्रकारांमध्ये मिसळले तर नेहमी पत्रकारांच्या गराड्यात राहणारे अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्रकाश जावडेकर आपल्या जागेवरच बसून राहिले.

अहंकारी सरकारने परंपरा बाजूला सारली-काँग्रेसराहुल गांधी यांना पथसंचलन कार्यक्रमात पहिल्या रांगेत स्थान न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणराज्यदिनाच्या राष्टÑीय पर्वावर अहंकारी सरकारने सर्व परंपरा बाजूला सारल्या, त्यांना आधी चौथ्या तर नंतर सहाव्या रांगेत हेतुपुरस्सर बसविण्यात आले, असे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाले आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले. टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी मागे बसले असल्याचा फोटोही आहे. या समारंभाच्या पहिल्या रांगेत माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि मनमोहनसिंग बसले होते. दुसºया रांगेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत यांना स्थान देण्यात आले. गतवर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

मोदींनी केले हस्तांदोलनराहुल गांधी सहाव्या रांगेत बसले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मजल गाठावी लागली. राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांनी गणराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ४७ वर्षीय राहुल यांचा हात हातात घेत त्यांनी कसे आहात? असा प्रश्न केला. गांधी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८