शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसविल्यावरून वाद, मोदींनी केले हस्तांदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 03:10 IST

राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

हरीश गुप्ता नवी दिल्ली: राजपथावरील गणराज्यदिन पथसंचलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आल्यामुळे वाद उफाळला आहे. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.दरम्यान, राहुल गांधी यांनी जागा किंवा रांगेबाबत मी चिंता करीत नाही, राष्ट्रपती भवनात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या ‘अ‍ॅट होम’ कार्यक्रमातही मी जागेबाबत तमा बाळगली नव्हती, असे सांगत भाष्य टाळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १० आसियान देशांच्या प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या अ‍ॅट होम कार्यक्रमात राहुल गांधी यांना व्हीआयपींमध्ये दुस-या रांगेत स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री, खासदार, राजदूत आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गणराज्यदिनानिमित्त राष्ट्रपतींनी आयोजित केलेले चहापान यावेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पहिल्यांदाच आसियानचे दहा राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. गणराज्यदिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत बसले होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. सर्व पाहुण्यांना कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी मोबाईल फोन सोबत आणण्याची मुभा देण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या आवडीच्या व्हीआयपींचे मुक्तपणे फोटो आणि व्हिडिओ घेतले.

विशेष म्हणजे दरवर्षी यादीत वाढ होत असताना पाहुण्यांची संख्या यावेळी ३ हजारावरून १२०० वर आणण्यात आली होती. पाहुण्यांच्या गर्दीवर आवर घालणे अवघड होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाहुण्यांना भेटणे सहज शक्य व्हावे, या उद्देशाने यावेळी यादीत कपात करण्यात आली. विविध देशांचे राजदूत, पुरस्कारविजेते आणि खासदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंत्री आणि व्हीआयपींना मुख्य स्थळी प्रवेश देण्यात आला होता. पंतप्रधानांनी नेहमीच्या शैलीत पाहुण्यांना सेल्फी घेण्याला परवानगी दिली.स्वराज यांची अनुपस्थिती खटकली...राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या चहापानाला विदेश मंत्री सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. विविध देशांच्या राजदूतांना त्यांना भेटता आले नाही. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन व मंत्री पत्रकारांमध्ये मिसळले तर नेहमी पत्रकारांच्या गराड्यात राहणारे अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्रकाश जावडेकर आपल्या जागेवरच बसून राहिले.

अहंकारी सरकारने परंपरा बाजूला सारली-काँग्रेसराहुल गांधी यांना पथसंचलन कार्यक्रमात पहिल्या रांगेत स्थान न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणराज्यदिनाच्या राष्टÑीय पर्वावर अहंकारी सरकारने सर्व परंपरा बाजूला सारल्या, त्यांना आधी चौथ्या तर नंतर सहाव्या रांगेत हेतुपुरस्सर बसविण्यात आले, असे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले. मोदी सरकारचे क्षुद्र राजकारण जगजाहीर झाले आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले. टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी मागे बसले असल्याचा फोटोही आहे. या समारंभाच्या पहिल्या रांगेत माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि मनमोहनसिंग बसले होते. दुसºया रांगेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत यांना स्थान देण्यात आले. गतवर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते.

मोदींनी केले हस्तांदोलनराहुल गांधी सहाव्या रांगेत बसले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मजल गाठावी लागली. राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांनी गणराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ४७ वर्षीय राहुल यांचा हात हातात घेत त्यांनी कसे आहात? असा प्रश्न केला. गांधी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८