शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दिल्ली नियंत्रणात; बिहार बंदला हिंसक वळण, ४0 जणांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:52 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध आंदोलन सुरूच। दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी ४0 जणांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच नवी दिल्लीत हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. दिल्लीचा जुना भाग आणि सीमापुरीमध्ये सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलेले आहे. जुन्या दिल्लीत दरियागंज आणि उत्तरपूर्व दिल्लीच्या सीमापुरीमध्ये शुक्रवारी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. दरियागंज व्यापारी संघाचे सचिव मनीष सेठ यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी या भागातील सर्व दुकाने उघडली आणि कोणतीही अशांतता नाही. शाहदरा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे.

दगडफेक करणाºया ५ जणांना घेतले ताब्यातउत्तर पूर्व दिल्लीत आंदोलनादरम्यान दगडफेक केल्याच्या आरोपात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत अतिरिक्त पोलीस उपायुक्त रोहित राजबीर सिंह जखमी झाले होते.

शिक्षण क्षेत्रातील १००० जणांचे कायद्याला समर्थनदेशातील विविध विद्यापीठांतील, शिक्षण क्षेत्रातील १००० पेक्षा अधिक नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन देत एक निवेदन जारी केले आहे. यात राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, आयआयएम शिलाँगचे अध्यक्ष शिशिर बजोरिया, नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरू सुनैना सिंह, जेएनयूतील प्रोफेसर ऐनूल हसन, अभिजित अय्यर मित्रा, कंचन गुप्ता यांचा समावेश आहे.

दरियागंजमध्ये १५ जणांना अटकजुन्या दिल्लीच्या दरियागंजमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. दंगल करणे, पोलिसांच्या ड्यूटीमध्ये अडथळा आणण्यासाठी बळाचा वापर करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी सुभाष मार्ग भागात एका उभ्या कारला आग लावली होती. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.भीम आर्मीच्या प्रमुखांना १४ दिवसांची कोठडीच्भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शनिवारी जामा मशिदीच्या बाहेर ताब्यात घेण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.च्आझाद म्हणाले की, आम्हाला बलिदान द्यावे लागेल जेणेकरून कायदा परत घेण्यात यावा. आम्ही हिंसाचाराचे समर्थन करीत नाही. आम्ही शुक्रवारी सकाळी मशिदीच्या आत बसलो होतो. आमचे लोक हिंसाचारात सहभागी नव्हते.मध्यप्रदेशात ३५ अटकेतच्मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ३५ लोकांना अटक केली आहे.च्शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीत २० पोलीस जखमी झाले होते. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील गोहलपूर आणि हनुमानताल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.‘ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांना वकिलांना भेटू द्या’च्दरियागंजमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या ४० लोकांना त्यांच्या वकिलांना भेटू द्या, असे निर्देश दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.च्ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जे जखमी आहेत त्यांना उपचार उपलब्ध करून द्या, असे निर्देश देतानाच न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादा अल्पवयीन या आंदोलनात कथित स्वरूपात सहभागी असेल तरीही त्याला ताब्यात घ्यायला नको.च् त्याच्यावर कायद्यानुसारच कारवाई करायला हवी. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या ८ अल्पवयीनांना सोडून देण्यात आले आहे.