शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तत्कालीन आयुक्तांच्या भूमिकेत विरोधाभास

By admin | Updated: July 20, 2016 23:49 IST

तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायची. शासनाला दिशाभूल करणारी माहिती कळवायची. तर न्यायालयात अडचण नको म्हणून खरी ती माहिती द्यायची, असा विरोधाभास कापडणीस यांच्या भूमिकेत दिसून येतो, असा आरोप देशमुख यांनी केला. मनपा ठराव क्र.१३५ देखील प्रशासनाने दिला होता. जर या चार मार्केटची जागा मनपाची नव्हती तर प्रस्ताव कसा दिला? असा सवालही त्यांनी केला.

तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायची. शासनाला दिशाभूल करणारी माहिती कळवायची. तर न्यायालयात अडचण नको म्हणून खरी ती माहिती द्यायची, असा विरोधाभास कापडणीस यांच्या भूमिकेत दिसून येतो, असा आरोप देशमुख यांनी केला. मनपा ठराव क्र.१३५ देखील प्रशासनाने दिला होता. जर या चार मार्केटची जागा मनपाची नव्हती तर प्रस्ताव कसा दिला? असा सवालही त्यांनी केला.
कापडणीस जळगावला विकून गेले
तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस हे जळगावकरांना अंधारात ठेवून जळगाव विकून गेले. साडेपाच लाख जनतेला वेठीस धरले. गाळ्यांचे महत्वाचे उत्पन्न मिळू न शकल्याने मनपा नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवू शकली नाही. प्रभागांमध्ये विकास कामे होऊ शकलेली नाहीत, असा आरोपही देशमुख यांनी करीत कापडणीस यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली.
फौजदारीच करा-रमेशदादा
खाविआचे सभागृहनेते रमेशदादा जैन म्हणाले की, देशमुख यांनी उपस्थित केलेल्या मुद्यास अनुमोदन आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी नपाला पत्र पाठवून आताच्या फुले मार्केटच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकर बांधावे, असा आग्रह धरला होता. कारण आठवडे बाजारात प्रचंड गर्दी होत असते. महिलांना त्रास होत असते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी नपाला मार्केट बांधण्याचे सुचविले होते. तो पत्रव्यवहारही मनपात आहे. मनपाची मालकी असताना ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचे खोटे कळविले. यातून या अधिकार्‍यांना जळगावबद्दल किती प्रेम होते? ते दिसते. त्यांच्यावर फौजदारी कारवाईच व्हायला हवी. मनपाचे आर्थिक नुकसान केले. ते वसुल करण्यात यावे. अधिकार्‍यांना शिक्षा झाल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही. राज्य शासन व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी माहिती पुरवून कारवाई करण्याची मागणी केली.
चौकशी करून कारवाई करा-नरेंद्र पाटील
मविआचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी सदस्यांनी जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य आहे की नाही? संबंधीत अधिकारी दोषी आहेत की नाहीत? याची चौकशी करून मग कारवाईची भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले. त्यासाठी वाटल्यास सर्वपक्षीय चौकशी समिती नेमावी, असे, सुचविले.