शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन आयुक्तांच्या भूमिकेत विरोधाभास

By admin | Updated: July 20, 2016 23:49 IST

तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायची. शासनाला दिशाभूल करणारी माहिती कळवायची. तर न्यायालयात अडचण नको म्हणून खरी ती माहिती द्यायची, असा विरोधाभास कापडणीस यांच्या भूमिकेत दिसून येतो, असा आरोप देशमुख यांनी केला. मनपा ठराव क्र.१३५ देखील प्रशासनाने दिला होता. जर या चार मार्केटची जागा मनपाची नव्हती तर प्रस्ताव कसा दिला? असा सवालही त्यांनी केला.

तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायची. शासनाला दिशाभूल करणारी माहिती कळवायची. तर न्यायालयात अडचण नको म्हणून खरी ती माहिती द्यायची, असा विरोधाभास कापडणीस यांच्या भूमिकेत दिसून येतो, असा आरोप देशमुख यांनी केला. मनपा ठराव क्र.१३५ देखील प्रशासनाने दिला होता. जर या चार मार्केटची जागा मनपाची नव्हती तर प्रस्ताव कसा दिला? असा सवालही त्यांनी केला.
कापडणीस जळगावला विकून गेले
तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस हे जळगावकरांना अंधारात ठेवून जळगाव विकून गेले. साडेपाच लाख जनतेला वेठीस धरले. गाळ्यांचे महत्वाचे उत्पन्न मिळू न शकल्याने मनपा नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवू शकली नाही. प्रभागांमध्ये विकास कामे होऊ शकलेली नाहीत, असा आरोपही देशमुख यांनी करीत कापडणीस यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली.
फौजदारीच करा-रमेशदादा
खाविआचे सभागृहनेते रमेशदादा जैन म्हणाले की, देशमुख यांनी उपस्थित केलेल्या मुद्यास अनुमोदन आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी नपाला पत्र पाठवून आताच्या फुले मार्केटच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकर बांधावे, असा आग्रह धरला होता. कारण आठवडे बाजारात प्रचंड गर्दी होत असते. महिलांना त्रास होत असते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी नपाला मार्केट बांधण्याचे सुचविले होते. तो पत्रव्यवहारही मनपात आहे. मनपाची मालकी असताना ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचे खोटे कळविले. यातून या अधिकार्‍यांना जळगावबद्दल किती प्रेम होते? ते दिसते. त्यांच्यावर फौजदारी कारवाईच व्हायला हवी. मनपाचे आर्थिक नुकसान केले. ते वसुल करण्यात यावे. अधिकार्‍यांना शिक्षा झाल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही. राज्य शासन व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी माहिती पुरवून कारवाई करण्याची मागणी केली.
चौकशी करून कारवाई करा-नरेंद्र पाटील
मविआचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी सदस्यांनी जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य आहे की नाही? संबंधीत अधिकारी दोषी आहेत की नाहीत? याची चौकशी करून मग कारवाईची भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले. त्यासाठी वाटल्यास सर्वपक्षीय चौकशी समिती नेमावी, असे, सुचविले.