नवी दिल्ली : काँग्रेसने संसदेत हक्कभंग प्रस्तावाच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध पहिल्या सर्वात मोठय़ा हल्ल्याची तयारी चालविली आहे. गुजरातमधील शेतक:यांना 24 तास वीज दिली जात असल्याची माहिती मोदींनी संसदेत दिली होती. प्रत्यक्षात त्यांनी खोटे बोलत सभागृहाची दिशाभूल केल्याने हा संसदेच्या हक्कभंगाचा मुद्दा बनतो, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रंनी म्हटले आहे.
मोदींनी संसदेत खोटे बोलल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावे असल्याचे संकेत काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी दिले आहेत. काँग्रेसने अन्य विरोधी पक्षांची एकजूट करीत मोदींवर संयुक्त हल्ला चढविण्याची तयारी केली आहे. मोदींशी दोन हात करण्याची तयारी असलेल्या अन्य पक्षांच्या बडय़ा नेत्यांशी गुलामनबी आझाद, मल्लिकाजरुन खरगे यांनी चर्चा चालविली आहे.
उत्तराखंडने दिले बळ...
उत्तराखंडमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तिन्ही जागा जिंकल्याने काँग्रेस आक्रमक धोरण अवलंबू इच्छिते. या पक्षाला महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये निवडणूक लढायची आहे. लगेच बिहार आणि कर्नाटकमध्येही पोटनिवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेसने विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4गुजरातमध्ये केवळ आठ तास वीज दिली जात असून याउलट काँग्रेसच्या राजवटीत 17 तास वीज दिली जात होती, असे गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तिसिंग गोहिल यांनी सांगितले. गुजरातमध्ये खुलेआम लूट सुरू आहे. मोदींनी अदानी, अंबानी, एस्सार या कंपन्यांना कोटय़वधींचा लाभ पोहोचविल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. कॅगचा अहवालच अखेरचा शब्द मानणारी भाजपा आता मौन का पाळून आहे, असा सवालही गोहिल
यांनी केला.