शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

सैन्याने रचलेला राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट

By admin | Updated: October 5, 2015 12:23 IST

१९८७ मध्ये सैन्याने राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट रचला होता असा खळबळजनक खुलासा सैन्याचे निवृत्त आर्मी कमांडर पी एन हून यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - १९८७ मध्ये सैन्याने राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट रचला होता असा खळबळजनक खुलासा सैन्याचे निवृत्त आर्मी कमांडर पी एन हून यांनी केला आहे. विशेष म्हणजे सैन्याच्या या कटात सरकारमधील काही ज्येष्ठ नेतेही सहभागी होते असे हून यांचे म्हणणे आहे.

पी एन हून यांनी 'अनटोल्ड ट्रूथ' या पुस्तकात राजीव गांधी सरकारविरोधात सैन्याने रचलेल्या कटाचा खुलासा केला आहे. शीख दंगलींमध्ये राजीव गांधींनी निष्काळजीपणा दाखवला होता. तसेच सरकारमधील काही नेतेही राजीव गांधींवर नाराज होते. १९८७ मध्ये हून हे पश्चिम विभागाचे आर्मी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी माझ्या हाती एक पत्र लागले होते, या पत्रात सैन्याने तीन निमलष्करी जवानांच्या तुकड्या मागवल्या होत्या. या तीन तुकड्या दिल्लीकडे कुच करणार होत्या असा दावा हून यांनी केला आहे.याप्रकाराची माहिती पंतप्रधान राजीव गांधी व तत्कालीन केंद्रीय मुख्य सचिव गोपी अरोरा यांनाही दिली होते असे हून यांनी म्हटले आहे. राजीव गांधी सरकारमधील मंत्री विद्याचरण शुक्ला यांनादेखील सैन्याच्या हालचालींची माहिती होती व यासाठी ते स्वतः माझी भेट घ्यायला आले होते असा उल्लेख हून यांनी केला आहे. तत्कालीन सैन्यप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी आणि सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस एफ रोडरीगुएज हे या कटात सामील होते असा दावाही त्यांनी केला आहे. हवाई दलाचे माजी प्रमुख रणधिर सिंह यांनी मात्र हून यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. रणधिर सिंह यांनी प्रदीर्घ काळ भारतीस सैन्यात काम केले आहे.