शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

2019 विसरा 2090 मध्येही काँग्रेस सत्तेत येणार नाही- नायडू

By admin | Updated: January 11, 2017 19:39 IST

2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशात अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी समाचार घेतला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - 2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशात अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी समाचार घेतला आहे. 2019 विसराच 2090 मध्येही कॉंग्रेस सत्तेत येणार नाही असं म्हणत नायडूंनी कॉंग्रेसला डिवचलं आहे.   
 
2019 साली कॉंग्रेस सत्तेत येईल हा राहुल गांधींचा दावा ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, 2019 सोडा 2090 मध्येही काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही, असं नायडू म्हणाले.
 
2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशाला अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी जनवेदना मेळाव्यात बोलताना म्हणाले होते. राहुल गांधींनी जनवेदना मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवला. आम्ही 70 वर्ष संस्थांचा आदर केला, मोदी आणि आरएसएसने अडीच वर्षात सर्वकाही बदलून टाकले. भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी मिळून आरबीआय सारख्या संस्थेला कमजोर केले असा आरोप राहुल यांनी केला.  
नोटाबंदीच्या निर्णयानंतर गाडयांची विक्री 60 टक्क्यांनी कमी झाली आपण 16 वर्ष मागे गेलो. पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यस्थेचा कणा मोडला असे आरोप राहुल यांनी केली. मोदी आणि मोहन भागवतांनी एका फटक्यात लोकांचे घामाचे पैसे, कागदामध्ये बदलले  असे राहुल म्हणाले.