शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

काँग्रेस आज नव्या लढ्याचा बिगुल फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 22:07 IST

केंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा हाच डाव उधळून लावण्याकरिता आज रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील शेतकऱ्यांना एकजूट केले जाणार आहे. सरकारच्या भूसंपादन दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मैदानावरुन आंदोलन छेडले होते. इतर पक्षांच्या मदतीने या मुद्यावरून सरकारवर दबाव आणण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असून त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची या पक्षाची मनिषा आहे. या किसान सन्मान रॅलीत राहुल गांधी नव्या संघर्षाची घोषणा करणार असून काँग्रेसच्या राजकारणातील ही नवी खेळी असणार आहे. या संपूर्ण संघर्षाचे श्रेय राहुल यांना दिले जाणार आहे. तसेच या माध्यमाने आपली शेतकरी व्होटबँक बळकट करण्याची या पक्षाची योजना आहे. आपला पारंपरिक मतदार गमावलेल्या काँग्रेसने राजकारणात पुन्हा वर्चस्व स्थापित करण्यासाठी शेतमजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे. राहुल गांधी यांनी अज्ञातवासातून परत आल्यापासून आजपर्यत केलेले दौरे याचे साक्षीदार आहेत. राहुल हे या काळात शेतकऱ्यांमध्येच राहिले. काँग्रेसच्या पाठिशी उभे राहणारे शेतकऱ्यांचे हे बळ किसान सन्मान रॅलीत बघायला मिळेल,अशी अपेक्षा आहे.केंद्र सरकारला जमिनी हिसकावू देणार नाही- काँग्रेसचे दिग्गज नेते ए.के. अ‍ॅन्टनी, मोतीलाल वोरा, भूपेंद्र हुड्डा आणि आर.एस. सुरजेवाला यांनी तर शनिवारपासूनच मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला. शेती उत्पादन समर्थन मूल्यांचे आकडे सादर करून मोदी सरकार खोटारडे आणि शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. - एक डाव पराभूत झाल्यानंतर आता राज्य सरकारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची केंद्राची इच्छा असून सरकारला असे करण्यापासून रोखावे लागेल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले. - शेतकऱ्यांनी पहिला संघर्ष जिंकला असून आता दुसरी लढाई लढायची आहे आणि शेतकऱ्यांच्या दिल्ली रॅलीने नवा लढा सुरू होणार आहे. यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतून सर्वाधिक गर्दी होणार आहे. इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनाही रॅलीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.