शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

काँग्रेस आज नव्या लढ्याचा बिगुल फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 22:07 IST

केंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा हाच डाव उधळून लावण्याकरिता आज रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील शेतकऱ्यांना एकजूट केले जाणार आहे. सरकारच्या भूसंपादन दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मैदानावरुन आंदोलन छेडले होते. इतर पक्षांच्या मदतीने या मुद्यावरून सरकारवर दबाव आणण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असून त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची या पक्षाची मनिषा आहे. या किसान सन्मान रॅलीत राहुल गांधी नव्या संघर्षाची घोषणा करणार असून काँग्रेसच्या राजकारणातील ही नवी खेळी असणार आहे. या संपूर्ण संघर्षाचे श्रेय राहुल यांना दिले जाणार आहे. तसेच या माध्यमाने आपली शेतकरी व्होटबँक बळकट करण्याची या पक्षाची योजना आहे. आपला पारंपरिक मतदार गमावलेल्या काँग्रेसने राजकारणात पुन्हा वर्चस्व स्थापित करण्यासाठी शेतमजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे. राहुल गांधी यांनी अज्ञातवासातून परत आल्यापासून आजपर्यत केलेले दौरे याचे साक्षीदार आहेत. राहुल हे या काळात शेतकऱ्यांमध्येच राहिले. काँग्रेसच्या पाठिशी उभे राहणारे शेतकऱ्यांचे हे बळ किसान सन्मान रॅलीत बघायला मिळेल,अशी अपेक्षा आहे.केंद्र सरकारला जमिनी हिसकावू देणार नाही- काँग्रेसचे दिग्गज नेते ए.के. अ‍ॅन्टनी, मोतीलाल वोरा, भूपेंद्र हुड्डा आणि आर.एस. सुरजेवाला यांनी तर शनिवारपासूनच मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला. शेती उत्पादन समर्थन मूल्यांचे आकडे सादर करून मोदी सरकार खोटारडे आणि शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. - एक डाव पराभूत झाल्यानंतर आता राज्य सरकारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची केंद्राची इच्छा असून सरकारला असे करण्यापासून रोखावे लागेल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले. - शेतकऱ्यांनी पहिला संघर्ष जिंकला असून आता दुसरी लढाई लढायची आहे आणि शेतकऱ्यांच्या दिल्ली रॅलीने नवा लढा सुरू होणार आहे. यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतून सर्वाधिक गर्दी होणार आहे. इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनाही रॅलीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.