शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी चिंतनासाठी घेतली काही आठवड्यांची रजा

By admin | Updated: February 23, 2015 16:34 IST

काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राहूल गांधींनी चिंतन करण्यासाठी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - एकामागोमाग एक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राहूल गांधींनी चिंतन करण्यासाठी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच ही माहिती दिली असून त्यामुळे राहूल बजेटच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत. राहूल यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाच्या गोटातून तर राहूल गांधींनी राजकारणातून कायमची रजा घ्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बजेटच्या पहिल्याच दिवशी राहूल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी होती. त्याचा नंतर खुलासा करताना राहूल गांधींनी काही आठवड्याची रजा घेतली असून पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे, पक्षाची पुनर्बांधणी कशी करायची यासाठी विचारविमर्ष करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी बजेटसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडत असताना त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बाळगायला हवं असं मत व्यक्त होत आहे. संसदेचं कामकाज अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं असं मत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांची मात्र राहूल गांधी यांच्या रजेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भंबेरी उडाली आहे. दिल्ली विधानसभेमध्ये १५ वर्षे राज्य केल्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिलाली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची अनुपस्थिती निरीक्षकांना खटकत असून काँग्रेसवर टीका करण्यासाठी विरोधकांना निमित्त मिळाले आहे.