शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून कामत यांचे मन वळविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: June 9, 2016 06:12 IST

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत राजकीय संन्यास मागे घेणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहे.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत राजकीय संन्यास मागे घेणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहे. कामत हे महत्त्वपूर्ण सहकारी असून पक्षासाठी काम करत राहतील. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच मार्ग शोधला जाणार असून अडचणी दूर केल्या जातील, असे काँग्रेसचे प्रवक्ते अजयकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.कामत यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केल्यानंतरही त्यांच्याकडील राजस्थान, गुजरातसारख्या महत्त्वपूर्ण राज्यांचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी कायम संपर्क चालविला असून पक्षनेतृत्वाने तूर्तास त्यांच्या कामकाजात फेरबदल करण्याचा हेतू स्पष्ट केलेला नाही.मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रभावावर अंकुश लावला जाऊ शकतो. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षनेतृत्वाकडे अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघू शकलेला नव्हता. त्यामुळेच कामत यांनी राजकीय संन्यासाचे पाऊल उचलल्याचे मानले जाते.लवकरच राहुल गांधींसोबत चर्चा....कामतांनी राजकीय संन्यासाची घोषणा करताच हादरलेल्या काँग्रेसने प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांना तत्काळ संकट दूर करण्याच्या कामी लावले मात्र कोणतीही ठोस निष्पत्ती न निघाल्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काही खास निकटस्थांकडे ही जबाबदारी सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच राहुल गांधी कामत यांच्याशी चर्चा करू शकतात. कामत यांनी राजी केले जाऊ शकते. राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चे काढू नयेत आणि आंदोलने करू नयेत, असे आवाहन गुरुदास कामत यांनी बुधवारी आपल्या समर्थकांना केले. (प्रतिनिधी)>कामत यांच्या घरवापसीसाठी आंदोलन गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय बदलावा आणि पक्षकार्यात सक्रीय व्हावे, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन केले. यावेळी कामत गटातील नेत्यांसोबतच निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे दुखावलेल्या नेत्यांनी हजेरी लावली. आमदार नसीम खान, जनार्दन चांदूरकर यांच्यासह माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मधू चव्हाण, कृष्णा हेगडे, अशोक जाधव, बलदेव खोसा आदी नेत्यांनी यावेळी आंदोलकांना संबोधित केले.