शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- कर्नाटकात ११ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक टाळल्यास अथवा पुढे ढकलल्यास घोडेबाजाराला उघड उत्तेजन मिळेल, अशी तक्रार घेऊन दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. भाजपा व जनता दल (सेक्युलर)ने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत. काँग्रेसने जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस आणि के. सी. राममूर्ती, तर भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि जद (से) ने बी. एम. फारूक यांना उमेदवारी दिली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ४५ मते हवीत. विधानसभाध्यक्ष वगळता काँग्रेसकडे १२२ मते आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयासाठी पक्षाची ३२ अधिकृत मते मिळाल्यावर आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी १ अपक्ष व जद (से) च्या ५ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची माहिती हाती आहे.कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत धनशक्तीचा वापर कसा होतो आहे, या संबंधी एका वृत्तवाहिनीने नुकतेच एक स्टिंग आॅपरेशन प्रसारित केले. यानंतर, घोडेबाजाराला घाबरलेल्या काँग्रेसने सुरक्षिततेचा उपाय म्हणून अपक्ष आमदार अशोक खेनीसह यशवंतपूरचे आमदार सोमाशेखर यांच्या नेतृत्वाखाली १४ आमदार मुंबईला रवाना केले. या आमदारांचा मुक्काम सध्या मुंबईच्या जेडब्लू मॅरियट हॉटेलात आहे. हे आमदार १0 जून रोजी बंगलुरूला परतणार असून, ११ जून रोजी मतदानात भाग घेतील. त्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलू नये व मतदान नियोजित वेळीच व्हावे, या मागणीसाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले.>विधानसभेतले पक्षीय संख्याबळकर्नाटक विधानसभेत काँग्रेस १२३, भाजपा ४४, जद (से) ४0, अपक्ष ९, अन्य छोटे पक्ष ७ व नामनियुक्त १ अशा २२५ सदस्यांचे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला १३, भाजपाला १ तर जद(से)उमेदवाराला १0 मतांची गरज आहे. सर्व पक्षांची नजर अपक्ष ९, अन्य पक्षांच्या ७ आमदारांवर आहे. अशा वातावरणात घोडेबाजाराला उत्तेजन मिळू नये, यासाठी काँग्रेसने १४ आमदारांना मुंबईला हलवले, तर भाजपाने ही निवडणूकच पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.