शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ग्रामीण गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी

By admin | Updated: December 3, 2015 04:02 IST

लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाची लाट आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसने भाजपच्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाची लाट आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. सहाही महापालिकांमध्ये भाजपने वरचष्मा कायम राखला असला तरी ग्रामीण भागात कमळ कोमजल्याचे चित्र आहे.३१ पैकी १८ जिल्हा परिषदांमध्ये बाजी मारल्याचा आणि अन्य पाच जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी टिष्ट्वटरवर केला असला तरी अंतिम निकाल घोषित होईपर्यंत त्याला अधिकृतरीत्या दुजोरा मिळालेला नव्हता. त्यांनी ६.५ कोटी गुजरातींचे अभिनंदनही केले. हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे राज्य ढवळून काढले असताना त्यांचा महापालिका निवडणुकीत प्रभाव दिसून आला नाही. मोदी-शाह आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासाठी ही बाब दिलासादायक ठरली.राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपला काँग्रेसने दोन दशकानंतर पंचायत निवडणुकीत का होईना भुईसपाट केले आहे. मोदी मुख्यमंत्री असतानाच्या १२ वर्षांच्या काळात काँग्रेस बहुस्तरीय निवडणुकीतून जवळपास हद्दपार झाली होती.२०१२ मधील विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात १८२ पैकी ११५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपने मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या सर्व २६ जागा पटकावल्या होत्या. (वृत्तसंस्था)भाजप सरकारविरुद्ध कौल- काँग्रेसभाजप सरकारविरुद्ध हा कौल असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. २०१० मध्ये ३१ पैकी ३० जिल्हा परिषदांमध्ये झेंडा लावणाऱ्या भाजपला हा जबर हादरा मानला जातो. २३० तालुका पंचायतींमध्ये एकूण ४७७८ जागा असून काँग्रेसने २२०४ जागांवर आघाडी मिळवत भाजपाला धोबीपछाड दिली आहे. ५६ पैकी ३४ नगर परिषदांमध्ये भाजप तर ९ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सहा महापालिकांसाठी २२ नोव्हेंबर रोजी, ३१ जिल्हा परिषदा, २३० तालुका पंचायत, ५६ नगर परिषदांसाठी २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली.हार्दिक निष्प्रभ ; आनंदीबेन यांचा ‘गड आला पण सिंह गेला’आनंदीबेन यांना मेहसाना जिल्'ातील भऊचराजी ही गटपंचायत भाजपकडे कायम राखता आली नाही. त्याचा उल्लेखही सूर्जेवाला यांनी ब्लॉगवर केला आहे. एकूणच आनंदीबेन यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली.मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच राजकीय लढाई आनंदीबेन पटेल यांनी संमिश्र यश मिळविले आहे. भाजपने अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर आणि वडोदरा या सहाही महापालिका कायम राखल्यामुळे हार्दिक पटेल यांचे आंदोलन निष्प्रभ ठरल्याचे मानले जाते. हार्दिक यांच्या वीरमगाम नगर परिषदेतही भाजपने बाजी मारली. पटेल समुदायाला आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ हार्दिक यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. हार्दिक यांच्या खास निकटस्थ दोघांच्या पत्नींनीही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.हे राज्यातील मिनी निवडणूक होती. ग्रामीण भागात बाजी मारत काँग्रेसने हा राज्य सरकारविरुद्ध कौल असल्याचे दाखवून दिले आहे.- भारतसिंग सोळंकी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. उंझा नगर परिषदेवर अपक्षांचा झेंडा...गेल्या दोन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मेहसाना जिल्'ातील उंझा नगर परिषदेच्या ३६ पैकी ३५ जागा जिंकत अपक्षांनी या राष्ट्रीय पक्षाला पार भुईसपाट केले. एक जागा काँग्रेसने पटकावल्यामुळे भाजपच्या पदरी चक्क भोपळा पडला आहे. उंझामध्ये पाटीदार समुदायाचे वर्चस्व असून आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसल्याचे मानले जाते. हार्दिक पटेल यांना या शहरात अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले होते.