शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

काँग्रेसनं 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं- शंकर सिंह वाघेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:39 IST

काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमतगांधीनगर, दि. 21 - काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाघेलांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. वाघेलांनी या कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन केलं असून, काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचा होमवर्क कमी आहे. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढून टाकलं आहे. त्यांना मी काय भूमिका घेईन याची भीती वाटली होती. विनाशकाले विपरित बुद्धी, म्हणत वाघेलांनी काँग्रेसला धारेवर धरलं आहे. मी लोकांसाठी नेहमीच उपस्थित असेन, जनतेसाठी नीळकंठ बनण्यास मी तयार आहे. भगवान शंकरानं मला विष प्राशन करणं शिकवलंय. लोकांसाठी मी विष पिण्यासही तयार आहे. सध्या मी 77 वर्षांचा आहे. मात्र मी कधीही रिटायर्ड होणार नाही. हा माझ्या आयुष्यातला निर्णायक क्षण आहे. यावेळी वाघेला यांनी संघाच्या शिस्तीचंही कौतुक केलं आहे. संघानं मला लोकांची सेवा करण्यास शिकवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात समेट घडवून आणल्याचंही वाघेलांनी सांगितलं आहे. आम्ही आमदार आणि खासदार बनवणारे आहोत. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मेहतन घेऊन केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात 1995मध्ये भाजपाला सत्तेत आणलं. मी सत्तेसाठी कधीच लाचार झालो नाही, असंही वाघेला म्हणालेत.

आणखी वाचा(कोण आहेत शंकरसिंह वाघेला?)विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड करणारे वाघेला !शंकरसिंह वाघेला हे पुर्वी जनसंघाचे त्यानंतर जनता पार्टीचे आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. 1996 साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी गुजरातचे मुख्यमंत्रिपदही भूषवता आले. 1997 साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. वाघेला हे पाच वेळा लोकसभेत निवडून गेले असून 1984 ते 1989 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. संपुआ सरकारमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत.1995 साली वाघेला यांनी 47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड केले होते. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. मात्र 1997 त्यांना पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी दिलीप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले नाही. अखेर 1998 साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.