शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काँग्रेसनं 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं- शंकर सिंह वाघेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:39 IST

काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमतगांधीनगर, दि. 21 - काँग्रेसनं मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं, असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाघेलांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. वाघेलांनी या कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन केलं असून, काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचा होमवर्क कमी आहे. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढून टाकलं आहे. त्यांना मी काय भूमिका घेईन याची भीती वाटली होती. विनाशकाले विपरित बुद्धी, म्हणत वाघेलांनी काँग्रेसला धारेवर धरलं आहे. मी लोकांसाठी नेहमीच उपस्थित असेन, जनतेसाठी नीळकंठ बनण्यास मी तयार आहे. भगवान शंकरानं मला विष प्राशन करणं शिकवलंय. लोकांसाठी मी विष पिण्यासही तयार आहे. सध्या मी 77 वर्षांचा आहे. मात्र मी कधीही रिटायर्ड होणार नाही. हा माझ्या आयुष्यातला निर्णायक क्षण आहे. यावेळी वाघेला यांनी संघाच्या शिस्तीचंही कौतुक केलं आहे. संघानं मला लोकांची सेवा करण्यास शिकवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात समेट घडवून आणल्याचंही वाघेलांनी सांगितलं आहे. आम्ही आमदार आणि खासदार बनवणारे आहोत. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मेहतन घेऊन केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात 1995मध्ये भाजपाला सत्तेत आणलं. मी सत्तेसाठी कधीच लाचार झालो नाही, असंही वाघेला म्हणालेत.

आणखी वाचा(कोण आहेत शंकरसिंह वाघेला?)विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड करणारे वाघेला !शंकरसिंह वाघेला हे पुर्वी जनसंघाचे त्यानंतर जनता पार्टीचे आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. 1996 साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी गुजरातचे मुख्यमंत्रिपदही भूषवता आले. 1997 साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. वाघेला हे पाच वेळा लोकसभेत निवडून गेले असून 1984 ते 1989 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. संपुआ सरकारमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत.1995 साली वाघेला यांनी 47 आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड केले होते. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. मात्र 1997 त्यांना पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी दिलीप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले नाही. अखेर 1998 साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.