शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
4
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
5
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
6
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
7
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
8
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
9
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
10
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
11
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!
12
सर्पदंशाने १९ वेळा मृत्यू झालेला शेतकरी सापडला जिवंत, म्हणाला, आता मी....  
13
केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरा, स्काल्पला होतील भरपूर फायदे
14
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
15
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
16
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
17
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
18
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
19
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
20
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग १ नऊ वर्षे एकहाती धुरा का ? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

नागपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.

नागपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा तीन निवडणुका झाल्या. मात्र, तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत असलेली सत्ता हातून गेली. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना रामटेक मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागला तर, विधानसभा निवडणुकीत सहाच्या सहाही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. त्यावेळी नागपूर शहर काँग्रेसची धुरा जयप्रकाश गुप्ता यांच्याकडून विकास ठाकरे यांना देण्यात आली. मात्र, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांना कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर कायम ठेवण्यात आले. ही बाब पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली होती. मात्र, वासनिक यांनी हा निर्णय घेतला असल्यामुळे कुणी उघडपणे विरोध केला नाही.
दीड वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत ज्यांचा डाव साधला त्यांच्यासाठी पुढील निवडणुका आणखी सोप्या होतात. ग्रामीण राजकारणातील सत्तेची सूत्रे जिल्हा परिषदेतूनच हलविली जातात. मात्र, एवढी महत्त्वाची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण नाही. निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. आहे तसे सुरू आहे. कार्यकाळ पूर्ण होऊनही गावंडे यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार असल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. एकाच व्यक्तीकडे पद राहणार असेल तर आम्ही परिश्रम कशाला घ्यायचे, असा सवाल संबंधित कार्यकर्ते आपल्या नेत्यांना विचारू लागले आहेत.