शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने हरियाणातील जमीन लुटल्याचे काय?

By admin | Updated: September 19, 2015 22:47 IST

भूसंपादन विधेयकावर काँग्रेसने आयोजित केलेल्या विशाल विजय रॅलीपूर्वी रालोआ सरकारने आक्रमक धोरण अवलंबत हरियाणातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकावर काँग्रेसने आयोजित केलेल्या विशाल विजय रॅलीपूर्वी रालोआ सरकारने आक्रमक धोरण अवलंबत हरियाणातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीविना ही जमीन कशी संपादित करण्यात आली आणि तिचा वापर अन्य मार्गांसाठी कसा करण्यात आला, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असा रोखठोक सवाल करीत सरकार मैदानात उतरले आहे.भूसंपादन विधेयकावर सरकारने माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसने दिल्लीत जंतरमंतरवर ‘किसान - मजदूर सम्मान रॅली’ आयोजित केली आहे. काँग्रेसने ही रॅली आयोजित करण्यापूर्वी हरियाणातील शेतकऱ्यांच्या जमिनीसंबंधी प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि ग्रामीण विकासमंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांनी म्हटले. पहिल्यांदा सत्य स्पष्ट करा, मगच रॅली आयोजित करा. शेतकऱ्यांची जमीन लुटल्याबाबत स्पष्टीकरण द्या. रॅली आयोजित करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ देत आहोत. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्याकडून उत्तर मिळवा. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची लूट करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व हुडा यांनी केले, त्यांनीच उत्तर द्यावे, असे नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)काँग्रेसच व्हिलन - नायडूकाँग्रेसने १८९४च्या ब्रिटिश कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांची लूट चालविली होती. संपुआच्या नऊ वर्षांच्या काळातही तेच सुरू होते, असे नायडूंनी म्हटले. आता काँग्रेसने नक्राश्रू ढाळणे सुरू केले आहे. तुम्ही भाजपावर टीका करण्याची हिंमत कशी करता? तुमच्या राजवटीत लाखो एकर जमीन बळकावण्यात आली. आम्ही तसे केलेले नाही. खरे खलनायक (व्हिलन) तुम्ही आहात, आम्ही नाही, असेही ते म्हणाले.सादर केली आकडेवारीहुडा सरकारच्या काळात हरियाणात उद्योग आणि नगररचनेसाठी एकूण ७८,६९५ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. त्यातील १९,३०९ एकर जमीन नंतर अधिसूचित यादीतून हटविण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (सेझ) मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली. राज्यात किमान १५ ठिकाणी संपादनासाठी जमीन अधिसूचित करण्यात आली, अशी माहिती जाट नेते असलेल्या वीरेंद्रसिंग यांनी दिली. ते काँग्रेसमध्ये असताना हुडा यांचे कट्टर विरोधक मानले जात होते.