शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

महिला उमेदवार देण्यात काँग्रेस आघाडीवर

By admin | Updated: September 30, 2014 01:06 IST

भाजपा-सेनेतून महिलांना उमेदवारी नाही : पश्‍चीम व-हाडातील चित्र.

राजेश शेगोकार /बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणात आतापर्यंंत केवळ एकच जागा व त्यातही मित्रपक्षाची अडजेस्टमेंट करण्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांना विशेषता: महिलांना उमेदवारीपासुन वंचीत ठेवण्यात येत होते.यावेळी मात्र युती व आघाडी दुभंगल्यामुळे राजकीय पक्षांसमोर जागा उपलब्ध असतानाही केवळ काँग्रेस वगळता कुठल्याही राजकीय पक्षाने महिलांना उमदेवारी दिली नाही हे स्पष्ट झाले आहे. येनवेळी युती व आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवार निवडीसाठी प्रचंड गोंधळ उडाला या गोंधळामध्ये ह्यआयातह्ण उमेदवारांना अधिकृत उमेदवारीची लॉटरी लागली. स्वबळाचे बळ आजमावतांना आपण त्यामध्ये कमी पडू नये यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड आहे त्यामुळे काही करा पण जागा जिंका या सं ख्येच्या गणीतासाठी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील अकोला पश्‍चीम व वाशीम जिल्ह्यातून कारंजा या म तदारसंघातुन अनुक्रमे उषा विरक व ज्योती गणेशपुरे यांना उमेदवारी दिली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,सेना या प्रमुख पक्षांनी महिलांच्या मताचे राजकारण करतांना महिलांनाच उमेदवारी नाकारल्याचे समोर आले आहे.

** राष्ट्रवादीची एकमेव उमेदवारीही नाकारली

     राष्ट्रवादी काँग्रेसने बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंधासाठी माजी नगराध्यक्षा डॉ.स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. लोकसभा निवडणुकीत त्याचे वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला. हा जनादेश मान्य असल्यामुळे लगेचच निवडणुक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा महिला कोटा रिक्तच राहिला आहे.

 ** विदर्भात महायुतीच्या घटक पक्षांचे आव्हान संपले

   महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम या दोन्ही पक्षाचे आव्हान संपल्यागत जमा आहे. या पक्षांनी पश्‍चिम वर्‍हाडातील चिखली, रिसोड व बाळापुर या मतदारसंघाची मागणी करून आपला भाजपावर दबाव ठेवला होता मात्र आता महायुती दूंभगल्यावरही या पक्षांची अपेक्षा पुर्ती झालेली नाही. स्वाभिमानीची मतदारसंघाची मागणी पुर्ण न झाल्यामुळे विदर्भातील एकाही मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार राहणार नाही. काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असले तरी तेथे भाजपाचा उमेदवार असल्यामुळे असे अर्ज मागे घेतल्या जाणार आहेत. विदर्भातील चिखली या मतदारसंघासाठी स्वाभिमानीचा सर्वाधीक जोर होता मात्र काल पत्रकार परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय जाहिर केला.