शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो युती तुटली

By admin | Updated: November 1, 2014 01:54 IST

झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या झारखंडमध्ये सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. 
काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल व जनता दल युनायटेडसोबत मिळून लढविण्याचा निर्णय घेतला आहे व झामुमोसोबतची युती तोडली आहे. बिहारमधील विधानसभेची निवडणूकही काँग्रेसने या दोन पक्षांसोबत लढविली होती. झारखंडमध्ये 81 सदस्यांच्या विधानसभेकरिता 25 नोव्हेंबर ते 2क् डिसेंबर या काळात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. 
काही समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने 45 जागा मागितल्या होत्या व झामुमोला त्याच्या 36 जागांमधून दोन जागा राजद व जदयूला देण्यासाठी म्हटले होते.
निर्णय चुकीचा -झामुमो
काँग्रेसने झामुमोसोबतची युती तोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अनुभवल्यानंतरही असा निर्णय घेणो हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, तर झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आलोक दुबे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. 
झामुमो आमच्याजवळ सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने आला होता. आमच्या अजेंडय़ात झारखंडचा विकास अंतभरूत आहे, झामुमोचा विकास नाही असेही दुबे यांनी पुढे स्पष्ट केले. ही युती तुटण्याचे संकेत 27 ऑक्टोबरच्या समितीच्या बैठकीत दिसले होते जेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)