शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो युती तुटली

By admin | Updated: November 1, 2014 01:54 IST

झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या झारखंडमध्ये सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. 
काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल व जनता दल युनायटेडसोबत मिळून लढविण्याचा निर्णय घेतला आहे व झामुमोसोबतची युती तोडली आहे. बिहारमधील विधानसभेची निवडणूकही काँग्रेसने या दोन पक्षांसोबत लढविली होती. झारखंडमध्ये 81 सदस्यांच्या विधानसभेकरिता 25 नोव्हेंबर ते 2क् डिसेंबर या काळात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. 
काही समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने 45 जागा मागितल्या होत्या व झामुमोला त्याच्या 36 जागांमधून दोन जागा राजद व जदयूला देण्यासाठी म्हटले होते.
निर्णय चुकीचा -झामुमो
काँग्रेसने झामुमोसोबतची युती तोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अनुभवल्यानंतरही असा निर्णय घेणो हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, तर झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आलोक दुबे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. 
झामुमो आमच्याजवळ सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने आला होता. आमच्या अजेंडय़ात झारखंडचा विकास अंतभरूत आहे, झामुमोचा विकास नाही असेही दुबे यांनी पुढे स्पष्ट केले. ही युती तुटण्याचे संकेत 27 ऑक्टोबरच्या समितीच्या बैठकीत दिसले होते जेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)