शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेसने दंड थोपटले

By admin | Updated: June 10, 2014 00:38 IST

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरू झाली आहे. सरकार काँग्रेसला कोणतेही महत्त्वपूर्ण पद द्यायला तयार नाही.

डावलण्याचा डाव : अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेसला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरू  झाली आहे. सरकार काँग्रेसला कोणतेही महत्त्वपूर्ण पद द्यायला तयार नाही. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासह, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदांवर दावा सांगितला    आहे.
अण्णाद्रमुक आणि तृणमूल काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपद, तसेच लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देत काँग्रेसला अडगळीत टाकण्याचा डाव भाजपाने आखला आहे.
संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या मागणीवरून टर उडविली. देशातील जनतेने काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदासाठीही निवड केलेली नाही, मग विरोधी पक्षनेतेपद कसे देणार, असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे काँग्रेसने या मुद्यावर आक्रमक धोरण अवलंबण्याची तयारी केली आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावत संसदेतील डावपेचांवर चर्चा केली. 
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देण्याचे काम आनंद शर्मा करणार असून, लोकसभेतील नावासाठी शोध सुरू आहे. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने काँग्रेसने राज्यसभेत जोरदार हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाविरोधात एकजूट
भाजपाला जोरदार विरोध करण्यासाठी समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि अन्य छोटय़ा पक्षांसोबत समन्वय राखत सरकारवर अंकुश आणण्यासाठी काँग्रेसने डावपेच आखले आहेत. मंगळवार आणि बुधवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्यावेळी या विरोधकांची एकजूट दिसून येईल, असे संकेत मिळाले आहेत.
 
जनतेने या पदासाठी कोणालाही निवडले नाही- नायडू
-लोकांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाची निवड केलेली नाही. परंतु हा विषय अद्याप बंद झालेला नाही, असे नायडू म्हणाले.
-काँग्रेसमध्ये जनादेशाची भावना समजून घेण्याची क्षमताच नाही. जर एखाद्या पक्षाला 55 जागा मिळालेल्या असतील तर या मुद्यावर कोणतीही चर्चा व्हायला नको. 
-विरोधी पक्षनेत्याची निवड हा लोकसभा अध्यक्षांचा विशेषाधिकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
केवळ काँग्रेसचे नाही; संपुआचे संख्याबळ लक्षात घ्यावे
-काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी म्हणून निवडणूक लढविली असल्याने, केवळ काँग्रेसचे संख्याबळ न मोजता संपुआचे संख्याबळ लक्षात घेतले जावे. तृणमूल काँग्रेस, बीजद, अण्णाद्रमुक यांनी निवडणुकीनंतर आघाडी स्थापन केली आहे, याकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी लक्ष वेधले. लोकसभेत काँग्रेसचे केवळ 44 खासदार असल्यामुळे या पक्षाला दडपता येईल, असे भाजपाला वाटते; मात्र आमची दोन हात करण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.