शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

काँग्रेसनेच भारतात घराणेशाही आणली

By admin | Updated: June 27, 2016 04:13 IST

देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. तब्बल दोन दशके रखडलेल्या आर्थिक सुधारणा, भारताची लोकशाही ‘घराणेशाही’त परिवर्तीत आणि भ्रष्टाचारास सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप जेटली यांनी केला.काँग्रेसच्या खात्यात आणीबाणीशिवाय सुवर्ण मंदिरातील आॅपरेशन ब्लू स्टार राबविल्याचाही कलंक लागलेला आहे. या मुद्यांवर सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचे काही मत आहे काय? स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस पक्षावर दृष्टिक्षेप टाकला तर या पक्षावर आर्थिक सुधारणांमध्ये दोन दशकांचा विलंब लावणे, भारताच्या लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर करणे, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करणे, आॅपरेशन ब्लू स्टार आणि भ्रष्टाचार यांसारखे अनेक कलंक लागले आहेत, असे जेटली म्हणाले.४१ वर्षांपर्वी २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानिमित्त ‘४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली संवैधानिक हुकूमशाही’ या शीर्षकाखाली जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर हे भाष्य केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) >हुकूमशाही आणली‘आणीबाणीचा परिणाम देशात हुकूमशाही लागू करण्यात झाला. सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करण्याचे न्यायालयांचे अधिकार काढून घेण्यात आले. हुकूमशाहीपुढे न्यायालय नतमस्तक झाले. प्रेस सेंसॉरशीप लागू करण्यात आली. मीडियाही हुकूमशहांचा प्रवक्ता बनला. सार्वजनिक स्थळी निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी संसदेत विरोधी पक्षही नव्हता. हुकूमशहाने आपला पुत्र संजयला आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे करून भारताला घराणेशाही व्यवस्थेत रूपांतरित केले. पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळण्यात आला,’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.