शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

काँग्रेसनेच भारतात घराणेशाही आणली

By admin | Updated: June 27, 2016 04:13 IST

देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. तब्बल दोन दशके रखडलेल्या आर्थिक सुधारणा, भारताची लोकशाही ‘घराणेशाही’त परिवर्तीत आणि भ्रष्टाचारास सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप जेटली यांनी केला.काँग्रेसच्या खात्यात आणीबाणीशिवाय सुवर्ण मंदिरातील आॅपरेशन ब्लू स्टार राबविल्याचाही कलंक लागलेला आहे. या मुद्यांवर सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचे काही मत आहे काय? स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस पक्षावर दृष्टिक्षेप टाकला तर या पक्षावर आर्थिक सुधारणांमध्ये दोन दशकांचा विलंब लावणे, भारताच्या लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर करणे, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करणे, आॅपरेशन ब्लू स्टार आणि भ्रष्टाचार यांसारखे अनेक कलंक लागले आहेत, असे जेटली म्हणाले.४१ वर्षांपर्वी २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानिमित्त ‘४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली संवैधानिक हुकूमशाही’ या शीर्षकाखाली जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर हे भाष्य केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) >हुकूमशाही आणली‘आणीबाणीचा परिणाम देशात हुकूमशाही लागू करण्यात झाला. सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करण्याचे न्यायालयांचे अधिकार काढून घेण्यात आले. हुकूमशाहीपुढे न्यायालय नतमस्तक झाले. प्रेस सेंसॉरशीप लागू करण्यात आली. मीडियाही हुकूमशहांचा प्रवक्ता बनला. सार्वजनिक स्थळी निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी संसदेत विरोधी पक्षही नव्हता. हुकूमशहाने आपला पुत्र संजयला आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे करून भारताला घराणेशाही व्यवस्थेत रूपांतरित केले. पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळण्यात आला,’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.