शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

काँग्रेसचा सरकारवरील हल्ला तीव्र

By admin | Updated: October 30, 2014 00:37 IST

केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,

नवी दिल्ली : केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,असा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. तसेच काळा पैसा परत आणण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? असाही या पक्षाचा सवाल आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काळ्या पैशाच्या मुद्यावर मोठमोठी आश्वासने देणा:या सत्ताधारी पक्षावर टीका करताना काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की, 55 हजार खातेधारकांची नावे उघड करण्याची प्रतिज्ञा या पक्षाने घेतली होती. परंतु सत्तारूढ होऊन पाच महिने लोटून गेल्यानंतर 55 रुपयेसुद्धा आले नाहीत. 
भाजपाने मात्र विदेशी बँकांमधील काळा पैसा देशात परत आणण्याबाबत सरकारची वचनबद्धता कायम असून त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. सरकारने बुधवारी जिनिव्हा येथील एचएसबीसी बँकेत खाती असणा:या 627 भारतीयांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली. त्याअनुषंगाने काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. 
कुठल्याही राजकीय पक्षाने एखाद्या गोष्टीचे श्रेय लाटण्यासाठी देशाची दिशाभूल करणो अत्यंत चुकीचे असल्याचे प्रतिपादन सिंघवी यांनी केले. सरकारची आजची कार्यवाहीसुद्धा न्यायालयाच्या आदेशानंतरची आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आमच्याजवळ नावे आली तर आम्ही ती नक्की जाहीर करू आणि शंभर दिवसांच्या आत काळा पैसा परत आणू,असे आश्वासन भाजपा गेल्या पाच वर्षापासून देत आली आहे. 
4आता तिने आपला शब्द पाळला पाहिजे. लालकृष्ण अडवाणी यांनी 2क्11 मध्ये काळ्या पैशावर एक स्थगन प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सरकारने विदेशी खातेधारकांची नावे त्वरित जाहीर केली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.
 
4सरकार या मुद्याबाबत संवेदनशील असून प्रामाणिकपणो कारवाई करीत आहे. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे, असे मुख्तार अब्बास नकवी (उपाध्यक्ष,भाजपा) यांनी सांगितले.