शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

बिहारमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: November 9, 2015 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे.

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला घेरण्याची आपली मोहीम अधिक तीव्र करील; परंतु देशभरातील आघाडीच्या राजकारणावर मात्र राज्य पातळीवरच आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील.आपले धर्मनिरपेक्षतेचे राजकारण आजही प्रासंगिक आहे, असा काँग्रेसचा समज आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पत्रपरिषदेत याबाबत जाहीर खुलासादेखील केला आहे. द्वेष आणि विभाजनाचे राजकारण चालणार नाही, हे बिहार निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघावर थेट हल्लाबोल करताना ते म्हणाले, हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही.मोदींनी विदेश दौरे बंद करावेत आणि शेतकरी व युवकांना भेटावे, असा सल्लाही बिहार निवडणूक निकालामुळे अत्याधिक आनंदी झालेले राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिला. येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसतील, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले.ते पुढे म्हणाले, ‘या देशात विभाजनाच्या राजकारणाला कोणतेही स्थान नाही. बिहार निवडणुकीचे निकाल केवळ बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. मोदींनी आता भाषणे देणे बंद करून कामाला लागावे.