शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

बिहारमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: November 9, 2015 00:42 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे.

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला घेरण्याची आपली मोहीम अधिक तीव्र करील; परंतु देशभरातील आघाडीच्या राजकारणावर मात्र राज्य पातळीवरच आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील.आपले धर्मनिरपेक्षतेचे राजकारण आजही प्रासंगिक आहे, असा काँग्रेसचा समज आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पत्रपरिषदेत याबाबत जाहीर खुलासादेखील केला आहे. द्वेष आणि विभाजनाचे राजकारण चालणार नाही, हे बिहार निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघावर थेट हल्लाबोल करताना ते म्हणाले, हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही.मोदींनी विदेश दौरे बंद करावेत आणि शेतकरी व युवकांना भेटावे, असा सल्लाही बिहार निवडणूक निकालामुळे अत्याधिक आनंदी झालेले राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिला. येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसतील, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले.ते पुढे म्हणाले, ‘या देशात विभाजनाच्या राजकारणाला कोणतेही स्थान नाही. बिहार निवडणुकीचे निकाल केवळ बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. मोदींनी आता भाषणे देणे बंद करून कामाला लागावे.