शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नोटाबंदीवर काँग्रेसची ‘भूकंप’ पुस्तिका

By admin | Updated: January 1, 2017 01:16 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीनोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’ नावाच्या १६ पानांच्या पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेसने केले.‘भूकंप’च्या प्रस्तावनेमध्येही मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. त्यात म्हटले आहे की मोदी यांना भारत समजलाच नाही. कारण ज्या काळ््या पैशासाठी त्यांनी नोटा चलनातून बाद केल्या त्याचे प्रमाण अर्थव्यवस्थेत केवळ ६ टक्के आहे. पक्षाचे खासदार राजीव गौडा यांनी असा युक्तिवाद केला की छापे घालून ज्या नोटा जप्त केल्या त्या तर नोटाबंदी न करताही करता आल्या असत्या.पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी भाजपच्या बँक खात्यांचा तपशील जाहीर करून सांगितले की भाजपने आणि त्याच्या नेत्यांनी कुठे कुठे काळापैसा साठवून ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका करताना सांगितले की शाह यांच्या सांगण्यावरूनच अहमदाबाद सहकारी बँकेत ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले कारण काय तर शाह हे त्या बँकेचे संचालक आहेत. सूरजेवाला म्हणाले की मोदी हे असे पंतप्रधान आहेत की त्यांच्या शब्दाला काही मोल नाही. त्यांनी ५० दिवस मागितले होते व सगळे काही सुरळीत होईल, असे म्हटले होते. ५० दिवस संपले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)