शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने केला हल्लाबोल; मोदी सरकारने भीती, दडपण याशिवाय जनतेला काय दिले?

By admin | Updated: June 7, 2017 06:09 IST

शेतकऱ्यांत मोदी सरकारविषयी असंतोषाची लाट आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांत मोदी सरकारविषयी असंतोषाची लाट आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला शेतकरी संप पुकारून रस्त्यावर उतरला आहे. दोन्ही ठिकाणी सरकार भाजपाचे आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्यावर बेछूट लाठीमार होत आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती आहे, असे उद्गार राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काढले. ते म्हणाले, आमच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हरतऱ्हेचे निर्णय घेतले. उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. पण तीन वर्र्षात ते खोटे ठरल्याने दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.मोदी सरकारची तीन वर्षांची कारकीर्द निराशाजनक आहे, असो काँग्रेस कार्यकारिणीचे मत असल्याचे नमूद करीत आझाद म्हणाले, या ३ वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भीती, दडपण, तणाव आणि निराशेशिवाय दुसरे काहीच दिले नाही. दलित, तरुण, महिला, अल्पसंख्य हे सारेच सरकारच्या धाकदपटशाचे शिकार ठरले आहेत. अल्पसंख्य समुदाय दहशतीत वावरत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या व गुन्हेगारीच्या घटनांमधे तब्बल ३0 टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांत १0 कोटी रोजगार पुरवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने तीन वर्षांत जेमतेम ३ लाख रोजगार निर्माण केले. असंघटीत, संघटीत क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होण्याबरोबर, पायाभूत सोयी आणि बांधकाम क्षेत्रातले लाखो लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर या निर्णयाचा भयंकर प्रभाव पडेल असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी बजावलेही होते. सरकार मात्र स्वयंघोषित पद्धतीने नोटाबंदीचे लाभ देशाला ऐकवत सुटले. आता या निर्णयाच्या गंभीर परिणामांचे वास्तव लोकांसमोर येते आहे.>प्रसारमाध्यमांवर सरकारच्या धाकदपटशाचा अनुभव घेतलामोदी सरकारची भलामण न करता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर सरकार कशा प्रकारे धाकदपटशाचा अवलंब करते, त्याचे उदाहरण गेल्या २४ तासांत आपण सर्वांनी अनुभवले आहे.एनडीटीव्हीवरील धाडींचा नामोल्लेख न करता आझाद म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकांची ६ लाख कोटींची रक्कम काही निवडक लोकांकडे थकबाकीच्या स्वरूपात पडून आहे.त्याबाबत कारवाई करण्याऐवजी एका खासगी बँकेच्या वादग्रस्त वसुलीचे निमित्त पुढे करीत एका वृत्तवाहिनीवर धाडी टाकण्याचा प्रयोग सरकारने करून दाखवला. दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि इतर ज्येष्ठ नेते.