शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

भाजप सदस्याच्या विधानावरून गोंधळ

By admin | Updated: December 10, 2015 23:15 IST

दुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. ही विधाने कामकाजातून काढून टाकावीत व वीरेंद्रसिंग यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगावे, अशी मागणी काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी केली. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वादग्रस्त विधाने काढण्याचे आश्वासन दिले; मात्र वीरेंद्र्रसिंग यांनी माफी न मागितल्याने सरकारविरुद्ध घोषणा देत काँग्रेस व तृणमूल सदस्यांनी सभात्याग केला, तर राज्यसभेत सरकारच्या सूडबुद्धीच्या विरोधात सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ झाल्यामुळे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब झाले.अध्यक्षांकडे सदरप्रकरणी न्याय मागण्याच्या घोषणा देत काँग्रेस सदस्यांनी सलग दोन तास सभागृहात गोंधळ घातला. तेव्हा अध्यक्षा म्हणाल्या, कोणालाही माफी मागण्याची बळजबरी मी करू शकत नाही. यावेळी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत काँग्रेसने लोकसभेत सभात्याग केला. तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय व सौगत रॉय यांनीही हेच प्रकरण अधोरेखित करीत अध्यक्षांकडून विरोधकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि काँग्रेसपाठोपाठ सभात्याग केला. तृणमूल खासदारांचे काँग्रेसबद्दल अचानक वाढलेले प्रेम पाहून सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)> काय म्हणाले वीरेंद्रसिंगलोकसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलताना भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग म्हणाले, ‘काँग्रेस शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कळवळा तर व्यक्त करते; मात्र या पक्षाचे नेते राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यासारख्या नेत्यांना ज्वारी, बाजरी आणि गव्हात फरक काय ते देखील समजत नाही. एका गरीब घरातली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली, याची काँग्रेसजनांना खंत आहे. त्यांचा असा समज आहे की, हे पद फक्त गांधी-नेहरू घराण्यासाठीच राखीव आहे.’ वीरेंद्र्रसिंगांच्या उपरोक्त विधानांवर काँग्रेस सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. लोकसभाध्यक्षांनीही वीरेंद्र्रसिंगांना ताकीद देत त्यांची विधाने कामकाजातून काढून टाकणार असल्याचे जाहीर केले. सदस्याने दिलगिरी व्यक्त करावी, असेही अध्यक्षांनी सुचवले; मात्र वीरेंद्र्रसिंगांकडून प्रतिसाद मिळाला नाही. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडूंनी काँग्रेस सदस्यांच्या वर्तनाचे दाखले देत वीरेंद्र्रसिंगांचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.