शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

कंदहार अपहरणप्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता - रॉच्या माजी प्रमुखांची कबुली

By admin | Updated: July 3, 2015 10:27 IST

१९९९ मधील कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळताना भारताच्या आपातकालीन यंत्रणांचा गोंधळ उडाला होता अशी जाहीर कबुली रॉचे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - १९९९ मधील कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळताना भारताच्या आपातकालीन यंत्रणांचा गोंधळ उडाला होता अशी जाहीर कबुली रॉचे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी दिली आहे. विमान अमृतसरमध्ये उतरले तेव्हा केंद्र व पंजाब सरकार कोणताही निर्णय घेऊ शकली नाही व आपण अपहरणकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याची एक संधी गमावली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. 
रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी १९९९ चे कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळले असून शुक्रवारी त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अपहरणाच्या कटू आठवणींना उजाळा दिला. दुलत म्हणतात, क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपचा (सीएमजी) कंदहार अपहरण प्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता, विमान ज्यावेळी पंजाबमध्ये होते त्यावेळी पंजाब सरकार व केंद्र सरकार काहीच करु शकले नाही, पंजाब पोलिसांचे जवान विमानतळ परिसरात होते मात्र केंद्राकडून आदेशाची प्रतिक्षा करावी लागल्याने पोलिस काहीच करु शकले नाही असे दुलत यांनी सांगितले. दुलत यांनी नेमका काय गोंधळ होता यावर सखोल भाष्य करणे टाळले. कंदहार प्रकरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु होता असेही दुलत यांनी म्हटले आहे. कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दुरध्वनी करुन झापलेही होते अशी आठवण दुलत यांनी सांगितली.