शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कंदहार अपहरणप्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता - रॉच्या माजी प्रमुखांची कबुली

By admin | Updated: July 3, 2015 10:27 IST

१९९९ मधील कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळताना भारताच्या आपातकालीन यंत्रणांचा गोंधळ उडाला होता अशी जाहीर कबुली रॉचे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - १९९९ मधील कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळताना भारताच्या आपातकालीन यंत्रणांचा गोंधळ उडाला होता अशी जाहीर कबुली रॉचे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी दिली आहे. विमान अमृतसरमध्ये उतरले तेव्हा केंद्र व पंजाब सरकार कोणताही निर्णय घेऊ शकली नाही व आपण अपहरणकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याची एक संधी गमावली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. 
रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी १९९९ चे कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळले असून शुक्रवारी त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अपहरणाच्या कटू आठवणींना उजाळा दिला. दुलत म्हणतात, क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपचा (सीएमजी) कंदहार अपहरण प्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता, विमान ज्यावेळी पंजाबमध्ये होते त्यावेळी पंजाब सरकार व केंद्र सरकार काहीच करु शकले नाही, पंजाब पोलिसांचे जवान विमानतळ परिसरात होते मात्र केंद्राकडून आदेशाची प्रतिक्षा करावी लागल्याने पोलिस काहीच करु शकले नाही असे दुलत यांनी सांगितले. दुलत यांनी नेमका काय गोंधळ होता यावर सखोल भाष्य करणे टाळले. कंदहार प्रकरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु होता असेही दुलत यांनी म्हटले आहे. कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दुरध्वनी करुन झापलेही होते अशी आठवण दुलत यांनी सांगितली.