शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

निषेधाचे सूर तीव्र; आणखी सहा लेखकांचा एल्गार

By admin | Updated: October 15, 2015 23:36 IST

देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले.

नवी दिल्ली : देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले. राजस्थानातील प्रसिद्ध लेखक नंद भारद्वाज, इंग्रजीचे सुप्रसिद्ध कवी केकी एन. दारूवाला यांच्यासह आणखी सहा साहित्यिकांनी आपले अकादमी पुरस्कार परत केले. याचसोबत अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या ३३ झाली. नंद भारद्वाज, केकी एन. दारूवाला यांच्यासह प्रसिद्ध कन्नड लेखक के.वीर. भद्रप्पा, के. नीला, आर. के. हुदुंगी तसेच काशीराम अम्वालजी यांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले. या सर्व लेखकांनी अकादमीला पत्र लिहून देशातील वाढती असहिष्णुता आणि जातीय तणावावर चिंता व्यक्त केली. ज्ञानपीठ विजेत्यांचे समर्थनज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ हिंदी कवी कुंवर नारायण तसेच केदारनाथसिंह गुरुवारी अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. तसेच अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक काशीनाथ सिंह आणि अरुण कमल यांनी पुरस्कार परत करण्याऱ्या लेखकांना पाठिंबा दर्शवला. राष्ट्रपतींना साकडेकोलकाता : दादरी हत्याकांड आणि पुरोगामी विचारवंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ एकजूट होत पश्चिम बंगालचे ९० लेखक व बुद्धिजीवींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे. एम.एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्या आणि दादरी हत्याकांडप्रकरणी सरकारची उदासीनता दहशत निर्माण करणारी आहे, असे या लेखकांनी पत्रात लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)नवी दिल्ली: पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आपल्या ब्लॉगमधून सडकून टीका केली. इकलाखची हत्या ही दु:खद घटना आहे. पण लेखकांनी पुरस्कार परत करणे ही वैचारिक असहिष्णुता नाही का? डावे आणि नेहरूवादी विचारसरणीचे लोक मोदी सरकारसोबत जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यातूनच भाजप व मोदी सरकारविरोधात ‘खोटा कागदोपत्री विरोध’ नोंदविण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकारविरुद्ध सुरू असलेले हे दुसऱ्या प्रकारचे राजकारण आहे, असे जेटलींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.