शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

गोडसेच्या उदात्तीकरणाबद्दल राज्यसभेत चिंता

By admin | Updated: February 28, 2015 05:38 IST

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे सांगून काँग्रेसचे सदस्य हुसैन दलवाई यांनी शुक्रवारी राज्यसभेत गोडसेचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नावर चिंता व्यक्त केली. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना दलवाई म्हणाले, महात्मा गांधींनी आम्हाला आपल्या अधिकारासाठी लढण्यास शिकविले आहे; परंतु आज त्यांचाच मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गोडसेच्या नावावर मंदिर बांधण्याचा आणि पुलाला त्याचे नाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा घटना चिंताजनक आहेत. अशा खुन्याची पूजा करण्याचे थांबविले पाहिजे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते; परंतु मोदींकडून त्याचे उत्तर आले नाही, असे दलवाई म्हणाले. नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनीही अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. दलवाई यांच्या म्हणण्याला राज्यसभेतील अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला. या दरम्यान भाजपचे तरुण विजय म्हणाले, आम्ही महात्मा गांधींना वंदनीय मानतो, गोडसेला नाही. त्याआधी विजय यांनी अंदमान निकोबार येथे ब्रिटिश राजवटीत व्हाईसरायविरुद्धच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेर अली यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)