शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज्यसभेत पंजाबच्या समस्येबाबत चिंता

By admin | Updated: August 4, 2016 04:10 IST

राज्यसभेत बुधवारी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला.

नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. राज्यातील शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारचे मंत्री यात गुंतल्याचा आरोप असून, याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्यावर सरकारने या समस्येच्या उच्चाटनासाठी पावले उचलली जात असल्याचे सांगून केवळ कोणाचे नाव घेतल्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नामनियुक्त सदस्य केटीएस तुलसी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पंजाबमध्ये अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांची संख्या प्रचंड असून, राज्यातील १५ पैकी १३ जिल्ह्यांना या समस्येने ग्रासले आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची दररोज ४० प्रकरणे समोर येत असून, ही संख्या संपूर्ण देशातील प्रकरणांच्या निम्मी आहे.या समस्येच्या उच्चाटनासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, युवकांवर परिणाम घडवून आणणारी कोणतीही समस्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर नाही, असे सरकारने कधीही म्हटले नाही. या समस्येच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार सातत्याने पंजाब सरकारच्या संपर्कात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तीन मंत्री रॅकेटमध्ये गुंतल्याचा काँग्रेसचा हल्लाअमली पदार्थांच्या तस्करीत राज्यातील एक मंत्री गुंतला असल्याकडे तुलसी यांनी लक्ष वेधले असता रिजिजू म्हणाले की, केवळ कोणाचे नाव घेणे हा खटला दाखल करण्यासाठीचा पुरेसा आधार ठरू शकत नाही. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटकेत असलेला माजी राष्ट्रीय विजेता जगदीशसिंग भोला याने प्रकाशसिंग बादल सरकारचे तीन मंत्री या रॅकेटमध्ये गुंतले असल्याचा आरोप करून त्यांच्यातील एक जण याचा सूत्रधार असल्याचे म्हटलेले आहे, असे काँग्रेसचे नेते प्रतापसिंग बाजवा यांनी सभागृहात सांगितले.