शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत पंजाबच्या समस्येबाबत चिंता

By admin | Updated: August 4, 2016 04:10 IST

राज्यसभेत बुधवारी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला.

नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. राज्यातील शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारचे मंत्री यात गुंतल्याचा आरोप असून, याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्यावर सरकारने या समस्येच्या उच्चाटनासाठी पावले उचलली जात असल्याचे सांगून केवळ कोणाचे नाव घेतल्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नामनियुक्त सदस्य केटीएस तुलसी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पंजाबमध्ये अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांची संख्या प्रचंड असून, राज्यातील १५ पैकी १३ जिल्ह्यांना या समस्येने ग्रासले आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची दररोज ४० प्रकरणे समोर येत असून, ही संख्या संपूर्ण देशातील प्रकरणांच्या निम्मी आहे.या समस्येच्या उच्चाटनासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, युवकांवर परिणाम घडवून आणणारी कोणतीही समस्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर नाही, असे सरकारने कधीही म्हटले नाही. या समस्येच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार सातत्याने पंजाब सरकारच्या संपर्कात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तीन मंत्री रॅकेटमध्ये गुंतल्याचा काँग्रेसचा हल्लाअमली पदार्थांच्या तस्करीत राज्यातील एक मंत्री गुंतला असल्याकडे तुलसी यांनी लक्ष वेधले असता रिजिजू म्हणाले की, केवळ कोणाचे नाव घेणे हा खटला दाखल करण्यासाठीचा पुरेसा आधार ठरू शकत नाही. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटकेत असलेला माजी राष्ट्रीय विजेता जगदीशसिंग भोला याने प्रकाशसिंग बादल सरकारचे तीन मंत्री या रॅकेटमध्ये गुंतले असल्याचा आरोप करून त्यांच्यातील एक जण याचा सूत्रधार असल्याचे म्हटलेले आहे, असे काँग्रेसचे नेते प्रतापसिंग बाजवा यांनी सभागृहात सांगितले.