शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

हिंदू धर्माच्या संकल्पना सोप्या भाषेत याव्यात!

By admin | Updated: September 12, 2016 01:34 IST

आयुर्वेद आणि योगसाधनेत आगामी काळात जगात भारत प्रथम क्रमांकावर असेल यात शंका नाही. आधुनिक काळात भारताची वैदिक संस्कृती, परंपरा व हिंदु धर्माच्या आद्य संकल्पनांचे साऱ्या जगासमोर

सुुरेश भटेवरा,  नवी दिल्लीआयुर्वेद आणि योगसाधनेत आगामी काळात जगात भारत प्रथम क्रमांकावर असेल यात शंका नाही. आधुनिक काळात भारताची वैदिक संस्कृती, परंपरा व हिंदु धर्माच्या आद्य संकल्पनांचे साऱ्या जगासमोर सोप्या व सरळ शब्दात व आकर्षक सादरीकरण झाले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले. आळंदी येथील विश्व शांती केंद्र, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी आणि डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखालील विविध संस्थांतर्फे समन्वय महर्षी संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित ९ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात प्रमुख अतिथी या नात्याने गडकरी बोलत होते. शिकागोच्या धार्मिक परिषदेचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, स्वामी विवेकानंद केवळ हिंदु धर्माची महत्ता कथन करण्यासाठी शिकागोला गेले नव्हते तर वसुधैव कुटुंबकम् या आद्य तत्वज्ञानाचा पुरस्कार करीत, हिंदु धर्मात विश्व धर्माच्या संकल्पनेचा अंतर्भाव असल्याचे साऱ्या जगाला त्यांनी आत्मविश्वासाने सांगीतले. संत गुलाबराव महाराजांबद्दल यांच्या कार्याचा गौरव करताना त म्हणाले, गुलाबरावांचे चिंतन हा ज्ञानाचा महासागर आहे. संत ज्ञानेश्वरांना गुरू मानणाऱ्या गुलाबरावांनी विश्वकल्याणाचे आयुष्यभर जे चिंतन केले ते साऱ्या मानव जातीला प्रेरणादायी आहे. जगभर त्याचा प्रसार झाला पाहिजे, हे कार्य कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिध्दीस नेले पाहिजे असे आवाहनही गडकरींनी केले. इंडिया इन्टरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर याप्रसंगी म्हणाले, समन्वयाचा विचार भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, भारत त्याच्या बळावर साऱ्या जगाचा विश्वगुरू बनू शकतो.नारायण महाराज मोहोळ यांनी गुलाबराव महाराजांचे अभंग, पदे, गीते ,श्लोक आदी साहित्यकृतींचे भाषांतर जगातल्या विविध भाषांमधे करून जगभर त्याचा प्रसार करण्याचा संकल्प जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळयास उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि या सोहळयात बंगलुरूच्या मानव एकता मिशनचे अध्यक्ष महायोगी मधुकरनाथजी यांचेही भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव देश असा आहे की जो आपल्या देशाला मातेसमान मानतो. जागतिक व्यासपीठांवर भारताला इंडिया संबोधणे उचित नाही. पंतप्रधान मोदींनी यापुढे जयहिंद ऐवजी ‘भारतमाता की जय’ ही घोषणा जगभर बुलंद केली तर देशाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर होईल. -आचार्य धर्मेंद्र महाराज, जयपूरचे पंचपिठाधीश्वर सर्व धर्मांमध्ये मानवतेलाच सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. जनावरे एकमेकांंवर हल्ला करतात मात्र परस्परांचा शक्यतो जीव घेत नाहीत. सध्याच्या काळात माणसांचे आचरण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे की इतरांचे प्राण घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. आपण सारे मानव आहोत तेव्हा आपले जीवन मानवजातीच्या मूळ संस्कारांचे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.-श्री अन्सारी चतुर्वेदी, वेद, उपनिषद, भगवद्गीता व कुराणाचे गाढे अभ्यासकदेशातल्या साधुसंतांनी धर्म जाती पंथांमधले भेदाभेद नष्ट केले. समाज मनातून स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार पुसून टाकला तर अयोध्येतले राम मंदीर, मशीद यासारख्या वादाचे प्रश्न उद्भवणारच नाहीत. रोटी तोडून खावी लागते तर खिचडी मिसळून खाल्ली जाते. समाजाचे विभाजन आपल्याला पुन्हा पराधिनतेकडे नेईल. याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. -डॉ. रामविलास वेदांती, अध्यक्ष, रामजन्मभूमी न्यास, अयोध्या