शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

निलंबन मागे घेण्यात तडजोडीचे राजकारण?

By admin | Updated: November 5, 2015 23:29 IST

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्‍यांवर मात्र अन्याय झाल्याची भावना पोलीस दलात निर्माण झाली आहे. दरम्यान, या अन्याय झालेल्या २९ कर्मचार्‍यांपैकी काहींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या प्रकाराची माहिती कथन केली.

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्‍यांवर मात्र अन्याय झाल्याची भावना पोलीस दलात निर्माण झाली आहे. दरम्यान, या अन्याय झालेल्या २९ कर्मचार्‍यांपैकी काहींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून या प्रकाराची माहिती कथन केली.
तपास सुरु असतानाच जीवन पाटीलचे निलंबन मागे
निलंबन मागे घेण्यात आलेल्या बारा कर्मचार्‍यांमध्ये सादरे प्रकरणात आरोपी असलेल्या जीवन पाटील यांचाही समावेश आहे. पाटील हे सादरे यांचे विश्वासू व जवळची व्यक्ती होती. आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असताना रामानंद नगर पोलीस स्टेशनला जावून वाळूमाफिय सागर चौधरीचे डंपर सोडण्यासाठी जीवन पाटील सादरे यांच्याकडे गेल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले होते. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरुच आहे. न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले नाही असे असतांना जीवन पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची घाई का करण्यात आली असा सवाल आता विचारला जात आहे.

सोयीच्या जबाबासाठी खटाटोप
जीवन पाटील हे सादरे यांचे विश्वासू व त्यांच्याकडे काही माहिती असल्याने त्याचे बींग फुटू नये यासाठीच पोलीस अधीक्षकांनी खटाटोप करुन जीवन पाटील यांचे निलंबन मागे घेतले. आपल्या बाजुने जबाब द्यावा यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाटील यांची मनधरणी केली. त्यानुसार जीवन पाटील यांची एकदा नाशिकवारीही झाली आहे. पाटील यांचे निलंबन मागे घेतांना तपासाधिकार्‍याचाही अभिप्राय घेण्यात आलेला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
इन्फो..
माहिती देण्यास सुपेकरांचा नकार
पोलीस दलात ४१ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांची नावे व १२ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेतांना काय निकष लावला व अन्य २९ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात काय अडचण होती याबाबत पोलीस अधीक्षक सुपेकर यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यात नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार २९ कर्मचार्‍यांवर या १२ जणांपेक्षा सौम्य आरोप आहेत. एकट्या पाटीलसाठी १२ जणांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचीही चर्चा आहे.