शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

गुजरात बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: July 21, 2016 04:49 IST

चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला

अहमदाबाद : उना येथे ‘गायींचे संरक्षण’ करणाऱ्यांकडून चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दलित पँथर सेना आणि इतर संघटनांनी दलितांवरील अत्याचारांच्या तसेच उना येथील मारहाणीच्या निषेधार्थ बंदची हाक दिली होती. या अत्याचारांच्या मुद्यावरून राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजावर परिणाम झाला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी उना येथे भेट देणार आहेत. येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गायींचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. याप्रकरणी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.त्याच्या निषेधार्थ गुजरातच्या अमरेली शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी दगडफेक झाली होती आणि चार दलितांनी विष प्राशन केले होते. विष प्राशन करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. दगडफेकीत एक पोलीस कर्मचारीही मरण पावल्याचे सांगण्यात येते.बंद काळात काही ठिकाणी रस्ते अडविण्यात आले तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. बंदला बहुजन समाज पक्ष आणि जन संघर्ष मंचने तसेच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उदयपूर येथून पाठिंबा दिला होता.अहमदाबादेतील दैनंदिन व्यवहारांवर बंदचा परिणाम झाला नाही. मोजक्या भागातील दुकाने बंद होती. काही भागात निदर्शकांनी बंदची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी उना येथील मोटा समालियला (मारहाणीची घटना येथे घडली) खेड्याला भेट देऊन मारहाण झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ज्या प्रकारे मारहाण झाली ती बघणारा कोणीही अस्वस्थ होईल, असे पटेल म्हणाल्या. राज्य सरकारने मारहाण झालेल्या चारही तरुणांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. त्यांच्यावरील उपचारांचा खर्चही सरकारच करणार आहे. (वृत्तसंस्था)>दलितांना संरक्षण द्याकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचारांबद्दल बुधवारी चिंता व्यक्त करून केंद्र सरकारने दलितांची काळजी घ्यावी व त्यांना पूर्ण संरक्षण द्यावे, असे आवाहन केले. उनातील घटना ही दलितांविरुद्धचा संघटित गुन्हा आहे, असे त्यांनी टिष्ट्वटरद्वारे म्हटले.