शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

संपाला देशभर संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 3, 2016 06:44 IST

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपाला

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सर्व राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही राज्यांत रेल्वे, बसगाड्या अडवण्याचे प्रकार झाले, तर काही ठिकाणी रस्त्यांवर जाळपोळ करण्यात आली. संघटित, असंघटित कामगार, कर्मचारी आणि शेतमजूर तसेच अकुशल मजूर या संपात सहभागी झाले होते, असा दावा कामगार संघटनांनी केला. संपामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. या संपात बँका, टपाल कार्यालये तसेच विमा कार्यालये यात काम करणारे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे आर्थिक व्यवहार थंडावले. संपामुळे १९ हजार कोटी रुपये किमतीच्या सुमारे २६ लाख चेक क्लीअर झाले नाहीत, अशी माहिती आॅल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनचे सरचिटणीस सी. वेंकटचलम यांनी दिली.

काही राज्यांनी स्वत:हून शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात या संपाचा थेट परिणाम लोकांना जाणवला नाही. ओडिशात या संपामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. संपकऱ्यांनी रस्ते आणि रेल्वेमार्गांवर निदर्शने केली, तर कर्नाटकात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा फटका आसाममधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बँकिंगसह इतर सेवांना बसला. राष्ट्रीकृत बँका, विमा कंपन्या, टपाल कार्यालये बंद होती. गुजरातमध्ये बँकिंग व्यवहारांवर संपाचा मोठा परिणाम झाला. सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळ््या बँकांचे ३० हजार कर्मचारी संपात सहभागी होते. उत्तर प्रदेशात बँका बंद असल्या तरी परिवहन महामंडळाच्या बसगाड्या धावताना दिसल्या. संपाला पश्चिम बंगालमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिलिगुडीमध्ये २७० जणांना अटक करण्यात आली. सरकारी आणि इतर कार्यालयांचे कामकाज नित्याप्रमाणे सुरू होते. ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील संप कठोरपणे मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाकपने केला. हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेशात संपाने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम केला. शाळा,महाविद्यालये आणि इतर आवश्यक सेवा बंदच होत्या. विशाखापट्टणम येथे १०० जणांना ताब्यात घेण्यात आले. बिहारमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा आणि बँका बंद होत्या.