शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

घटक पक्ष नाराज!

By admin | Updated: August 12, 2016 02:57 IST

संसदेच्या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयके मंजूर करून घेतल्यामुळे भाजपत एकीकडे उत्साह असला तरी अनेक घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयके मंजूर करून घेतल्यामुळे भाजपत एकीकडे उत्साह असला तरी अनेक घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. संसदेच्या रणनीतीत आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, असा या पक्षांचा आक्षेप आहे. तथापि, या नाराजीमागे त्या-त्या राज्यातील राजकारणांचे संबंध आणि संदर्भ जोडले गेलेले आहेत. एनडीएचे घटक पक्ष प्रामुख्याने शिवसेना, तेलुगू देसम पार्टी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिरोमणी अकाली दल हे भाजपवर नाराज असून, संसदेतील रणनीती असो वा विरोधी पक्षांशी बातचीत यात आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे त्यांचे मत आहे. तेलुगू देसम पार्टीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भाजप आणि तेलुगू देसम पार्टी यांच्यात गत काही दिवसांपासून मतभेद सुरू झाले आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा शब्द भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीच्या काळात दिला होता; पण आता सत्तेत आल्यानंतर भाजप या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजपचे आंध्र प्रदेशातील राजकीय अस्तित्व तसे कमी आहे; पण तेलुगू देसम पक्षासाठी हे आश्वासन पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीसाठी पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक एक आव्हान आहे. अर्थातच, या राज्यात शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व भाजपपेक्षा अधिक आहे; पण याच पक्षाच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे सरकार चालविल्यानंतर आता आपल्याला सत्तापक्षाविरुद्ध असलेल्या लाटेचा फटका बसेल, याची भाजपला भीती आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातही कटुता निर्माण होत आहे. काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या संघर्षात आतापर्यंत पंचावनहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. भाजपसोबतच्या युतीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मत पीडीपीच्या एका गटाकडून व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)