शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मोठे प्रकल्प, संस्था, कार्यक्रम यांसाठी राज्यांमध्ये होणार स्पर्धा

By admin | Updated: October 18, 2016 04:47 IST

दिल्लीत बसून न ठरविता त्यासाठी इच्छुक राज्यांमध्ये स्पर्धा घेण्याची नवी पद्धत सुरू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महत्वाचे पायाभूत विकास प्रकल्प तसेच अद्ययावत उच्चशिक्षण व वैद्यकीय संस्था कुठे काढायच्या किंवा देश पातळीवरील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आणि महोत्सवांचे आयोजन कुठे करायचे हे दिल्लीत बसून न ठरविता त्यासाठी इच्छुक राज्यांमध्ये स्पर्धा घेण्याची नवी पद्धत सुरू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.कॅबिनेट सचिवालयाने केंद्र सरकारच्या सर्व खाती आणि विभागांना अलिकडेच पाठविलेल्या पत्रात याचे सूतोवाच करण्यात आले आहे. भविष्यात आयआयटी, आयआयएम व ‘एम्स’ यासारख्या संस्था कुठे सुरु करायच्या; बंदरे, तेल शुद्धिकरण कारखाने, एलएनजी टर्मिनल किंवा अन्न प्रक्रिया उद्योग कुठे उभारायचे अथवा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि प्रवासी भारतीय दिवस यासारखे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्यक्रम कुठे भरवायचे हे ठरविण्यासाठी ‘स्विस चॅलेंज’ पद्धत अनुसरण्याचा सरकारचा विचार आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इच्छुक राज्यांकडून निविदा मागविल्या जातील. कामाच्या किंवा कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार संबंधित राज्ये जमिनीची उपलब्धता, देण्यात येणाऱ्या सवलती व वित्तीय सोयी, रस्ता, रेल्वे यासारख्या वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता, पायाभूत नागरी सुविधांची सोय, आवश्यक मंजुऱ्या लवकरात लवकर देण्यासंबंधीचे धोरण आणि रोजगार निर्मितीची शक्यता इत्यादींविषयी राज्यांनी आपापले प्रस्ताव देणे अपेक्षित असेल.राज्यांनी दिलेल्या प्रस्तावातील वरीलप्रमाणे प्रत्येक निकषाच्या मुद्द्याला स्वतंत्र गुण दिले जातील आणि सर्वाची बेरीज करून एकूण प्रस्तावाचे गुणांकन केले जाईल. ज्या राज्याच्या प्रस्तावास अशा प्रकारे सर्वाधिक गुण मिळतील त्या राज्याला संबंधित प्रकल्प किंवा संस्था उभारण्याची अथवा कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी दिली जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व खात्यांनी आणि विभागांनी त्यांच्या अखत्यारितील कोणकोणते प्रकल्प, कामे व कार्यक्रम अशा पद्धतीने हाती घेता येतील व त्यांचे गुणांकन आणि मूल्यांकन करण्याचे कोणते निकष असावेत याचा निश्चित आराखडा या महिन्याच्या अखेरपर्यंत कॅबिनेट सचिवालयाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे.अशा प्रकारे उपलब्ध होणारी माहिती संकलित करून ती केंद्र सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल जेणेकरून इच्छुक राज्यांना त्यानुसार आपले निविदा प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या राज्याने एखाद्या कामासाठी पाठविलेला मूळ प्रस्तावही प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे अन्य राज्यास त्याहून चांगला व स्पर्धात्मक प्रस्ताव द्यायचा असेल तर तो ते देऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘स्विस चॅलेंज’ म्हणजे काय?‘स्विस चॅलेंज’ पद्धतीत मूळ निविदा प्रस्तावाहून अधिक चांगली निविदा कोणाला द्यायची असेल तर तसे करण्याची संधी दिली जाते. मूळ निविदाकाराने आपल्या निविदेत स्पर्धकाच्या तोडीसतोड सुधारणा करण्याची तयारी दर्शविली, तर तशा सुधारित निविदेनुसार त्याला काम दिले जाते. तसे करण्याची मूळ निविदाकाराची तयारी नसेल आणि ज्यांनी त्याहून अधिक चांगली निविदा दिली असेल, त्याला काम दिले जाते. अलिकडच्या काळात रेल्वे स्थानकांचा विकास, महामार्गांची बांधणी, मोठे सार्वजनिक गृहनिर्माण प्रकल्प अशा कामांसाठी या पद्धतीचा बऱ्याच वेळा वापर केला जातो.गुणवत्तेवर होईल निर्णय : ही पद्धत अवलंबिण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना पत्र म्हणते की, निर्णय प्रक्रिया पारदर्शी, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्तेवर आधारित असावी हा मुख्य हेतू आहे. यामुळे राज्यांमध्ये स्पर्धेची भावना वाढीस लागेल व त्यातून सर्वोत्तम पद्धतीने काम करून घेतले जाऊ शकेल.