शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

सरकार मागणार भरपाई

By admin | Updated: August 12, 2015 02:06 IST

‘मॅगी टू मिनिट नूडल्स’ हे उत्पादन त्यातील शिशे व अजिनोमोटोच्या जास्त प्रमाणामुळे सेवनास हानीकारक असूनही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथांचा अवलंब

नवी दिल्ली : ‘मॅगी टू मिनिट नूडल्स’ हे उत्पादन त्यातील शिशे व अजिनोमोटोच्या जास्त प्रमाणामुळे सेवनास हानीकारक असूनही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथांचा अवलंब करीत हे उत्पादन बाजारात विकून ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल भारत सरकार या नूडल्सचे उत्पादन करणाऱ्या नेस्ले इंडिया कंपनीविरुद्ध भरपाईचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहे.नेस्ले इंडिया ही नेस्ले या बलाढ्य स्वीस बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय उपकंपनी आहे. भारतीय अन्न प्रमाणक प्राधिकरणाने बंदी घातल्याने गेले दोन महिने मॅगी नूडल्सची देशभरात विक्री बंद असून कंपनीने बाजारात शिल्लक असलेला मालही परत मागवून नष्ट केला आहे. या बंदीविरुद्ध कंपनीने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, मॅगी नूडल्ससंबंधीची फाईल मंत्र्यांनी हातावेगळी केली असून त्यानुसार हे मंत्रालय नेस्ले इंडिया कंपनीविरुद्ध ४२६ कोटी रुपयांच्या भरपाईसाठी लवकरच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे फिर्याद दाखल करेल. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथेमुळे भारतीय ग्राहकांचे कंपनीने जे नुकसान केले त्याबद्दल ही भरपाई मागितली जाणार आहे. मॅगी नूडल्सचा वाद जून महिन्यात सर्वप्रथम सुरू झाला तेव्हा केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी हा गंभीर विषय असल्याचे नमूद करून याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाद मागितली जाईल, असे सुतोवाच केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)३० वर्षांत असा पहिला दावाउत्पादक आणि सेवा पुरवठादारांकडून होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध ग्राहकांना दाद मागता यावी आणि त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी ग्राहक संरक्षण कायदा केला गेला. त्यानुसार ग्राहकांच्या फिर्यादींची सुनावणी करून निवाडा करण्यासाठी जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ग्राहक न्यायालये स्थापन केली गेली.या न्यायालयांमध्ये आजवर ग्राहकच दाद मागत आले व फक्त ग्राहकच फिर्याद करू शकतात, असा सर्वसाधारण समजही आहे; परंतु तसे नाही. संपूर्ण ग्राहकवर्गाला ज्याची झळ पोहोचली असेल अशा विषयात ग्राहकांच्या वतीने केंद्र किंवा राज्य सरकारने ग्राहक न्यायालयात प्रातिनिधिक स्वरूपाची फिर्याद करण्याची अनोखी तरतूद या कायद्याच्या कलम १२-१-डी मध्ये आहे. त्याचाच आधार घेऊन केंद्र सरकार नेस्ले कंपनीविरुद्ध हा दावा दाखल करणार आहे. कायदा लागू झाल्यापासून गेल्या ३० वर्षांत सरकारने केलेला असा हा पहिलाच दावा असेल.