शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्या म्हणतात, वर्षभरात उभारणार एक लाख मोबाइल टॉवर

By admin | Updated: July 27, 2016 00:44 IST

ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात एक लाख नवे मोबाइल टॉवर उभारण्याचे

नवी दिल्ली : ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात एक लाख नवे मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन मोबाइल कंपन्यांनी दिले असून, त्याचबरोबर सरकारकडून जादा स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी बैठक घेतल्यानंतर दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, १०० दिवसांत ६० हजार मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. त्यापैकी ४८ हजार टॉवर त्यांनी ४५ दिवसांत उभे केले आहेत.दूरसंचारमंत्री म्हणाले की, कंपन्यांनी त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी एक वर्षाच्या निश्चित योजनेची हमी दिली आहे. आत्तापर्यंत त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पण ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव येऊन त्यांनी समाधान व्यक्त करायला हवे, असे सरकारचे म्हणणे आहे.खासकरून ‘कॉल ड्रॉप’च्या विषयावर टेलिकॉम कंपन्यांसोबत सरकारने घेतलेली ही दुसरी बैठक होती. याआधी टेलिकॉम सचिव जे. एस. दीपक यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांनी १०० दिवसांची योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार कंपन्यांनी एक वर्षात एक लाख मोबाइल टॉवर उभारण्याचे ठरविले आहे. प्रत्येक टॉवरला २० लाख रुपये याप्रमाणे यासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.सरकार आजवरच्या सर्वांत मोठ्या स्पेक्ट्रम लिलावाची तयारी करीत आहे. त्याआधी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सेवा सुधाराव्यात, असा सरकारचा आग्रह आहे. या लिलावात विविध फ्रिक्वेन्सी बँडचे २३ हजार मेगाहर्स्ट्स एवढे स्पेक्ट्रम विकले जाईल व त्यातून सरकारला ५.६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.हा लिलाव येत्या सप्टेंबरमध्ये होईल व त्यामुळे देशातील स्पेक्ट्रमचा तुटवडा दूर होईल, असेही मंत्री सिन्हा यांनी कंपन्यांना सांगितले.मोबाइल कंपन्यांनी ७१ ते ७६ गिगाहर्स्ट््स व ५० गिगाहर्स्ट्स एवढ्या उच्च फ्रिक्वेन्सी बँडचा स्पेक्ट्रमही विक्रीसाठी खुला करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या फ्रिक्वेन्सी बँडमधून पुरविल्या जाणाऱ्या ब्रॉड बँड टेलिकॉम सेवांनी, आॅप्टिकल फायबरप्रमाणे, दर सेकंदाला एक गिगाबाईट एवढ्या उच्च वेगाने डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)ग्राहकांना समाधानकारक अनुभव केवळ ‘कॉल ड्रॉप’पुरताच नव्हे, तर डेटा सर्व्हिसेसच्या बाबतीतही यायला हवा. पंतप्रधानांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी टेलिकॉम सेवांमध्ये अजूनही बरीच सुधारणा व्हायला हवी. - मनोज सिन्हा, मंत्री, दूरसंचार