शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्या म्हणतात, वर्षभरात उभारणार एक लाख मोबाइल टॉवर

By admin | Updated: July 27, 2016 00:44 IST

ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात एक लाख नवे मोबाइल टॉवर उभारण्याचे

नवी दिल्ली : ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात एक लाख नवे मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन मोबाइल कंपन्यांनी दिले असून, त्याचबरोबर सरकारकडून जादा स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी बैठक घेतल्यानंतर दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, १०० दिवसांत ६० हजार मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. त्यापैकी ४८ हजार टॉवर त्यांनी ४५ दिवसांत उभे केले आहेत.दूरसंचारमंत्री म्हणाले की, कंपन्यांनी त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी एक वर्षाच्या निश्चित योजनेची हमी दिली आहे. आत्तापर्यंत त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पण ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव येऊन त्यांनी समाधान व्यक्त करायला हवे, असे सरकारचे म्हणणे आहे.खासकरून ‘कॉल ड्रॉप’च्या विषयावर टेलिकॉम कंपन्यांसोबत सरकारने घेतलेली ही दुसरी बैठक होती. याआधी टेलिकॉम सचिव जे. एस. दीपक यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांनी १०० दिवसांची योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार कंपन्यांनी एक वर्षात एक लाख मोबाइल टॉवर उभारण्याचे ठरविले आहे. प्रत्येक टॉवरला २० लाख रुपये याप्रमाणे यासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.सरकार आजवरच्या सर्वांत मोठ्या स्पेक्ट्रम लिलावाची तयारी करीत आहे. त्याआधी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सेवा सुधाराव्यात, असा सरकारचा आग्रह आहे. या लिलावात विविध फ्रिक्वेन्सी बँडचे २३ हजार मेगाहर्स्ट्स एवढे स्पेक्ट्रम विकले जाईल व त्यातून सरकारला ५.६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.हा लिलाव येत्या सप्टेंबरमध्ये होईल व त्यामुळे देशातील स्पेक्ट्रमचा तुटवडा दूर होईल, असेही मंत्री सिन्हा यांनी कंपन्यांना सांगितले.मोबाइल कंपन्यांनी ७१ ते ७६ गिगाहर्स्ट््स व ५० गिगाहर्स्ट्स एवढ्या उच्च फ्रिक्वेन्सी बँडचा स्पेक्ट्रमही विक्रीसाठी खुला करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या फ्रिक्वेन्सी बँडमधून पुरविल्या जाणाऱ्या ब्रॉड बँड टेलिकॉम सेवांनी, आॅप्टिकल फायबरप्रमाणे, दर सेकंदाला एक गिगाबाईट एवढ्या उच्च वेगाने डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)ग्राहकांना समाधानकारक अनुभव केवळ ‘कॉल ड्रॉप’पुरताच नव्हे, तर डेटा सर्व्हिसेसच्या बाबतीतही यायला हवा. पंतप्रधानांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी टेलिकॉम सेवांमध्ये अजूनही बरीच सुधारणा व्हायला हवी. - मनोज सिन्हा, मंत्री, दूरसंचार