शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:18 IST

जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.

पुणे : स्त्रिया आणि दलित हे समाजातील दोन्ही प्रवाह नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांचा आवाजही कायम दाबला गेलेला आहे. नितीन आगेचे खून प्रकरण त्या मानसिकतेतूनच घडले आहे. जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.लोकायत, पुणे जिल्हा मोलकरीण संघटना, श्रमिक महिला मोर्चा, मासूम, युवक क्रांती दल, मिळून सार्‍याजणी, नारी समता मंचया समविचारी संघटनांच्यावतीने खर्डा येथील जातीय अत्याचारविरोधी घटनेच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेधा थत्ते, सुनीती सु. र., अतुल पेठे, मारूती भापकर, अन्वर राजन, मुकुंद किर्दत, नीरज जैन, मकरंद साठे उपस्थित होते. पुन्हा पुन्हा अशा सभा घेण्याची वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणार्‍या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी साक्ष देण्यासाठी पुढे यावे असे विद्या बाळ यांनी स्पष्ट केले.मारूती भापकर म्हणाले, 'दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर लाखोंच्या संख्येने तरूण-तरूणींनी पुढे येऊन प्रशासनाला घाम फोडला होता. त्याप्रमाणे आताही जातीवादाच्या विरोधात तरूण-तरूणींनी मोठया संख्येने एकत्र यावे. आता खेडयांकडे जाऊन लोकांमध्ये फुले व आंबेडकरांचे विचार रूजविण्याची आवश्यकता आहे.'नितीन आगे याच्या खूनानंतर प्रस्थापित व्यवस्थेने बाळगलेलं मौन सर्वाधिक त्रासदायक आहे. जातीचे किल्ले पाडायला आता सर्वांनी सिध्द झाले पाहिजे असे सुनिती सु. र. यांनी सांगितले. अतुल पेठे म्हणाले, 'फँ ड्री जिथे संपते तिथे नितीन आगेचे प्रकरण पुढ सुरू होते. २०१४ च्या वर्षात घडलेल्या या घटनेमुळ शरमेने मान खाली जाते आहे. या घटनेने दलितांबरोबरच मुलींनाही एक इशारा दिला गेला आहे. स्वत:च्या मर्जीने कुठल्याही तरूणाच प्रेमात पडाल तर तुमची अवस्था अशी होईल असा गर्भित अर्थ यामध्ये सामावलेला आहे.'पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अन्वर राजन यांनी स्पष्ट केले. लेखक व साहित्यिकांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असल्याचे मकरंद साठे यांनी सांगितले.