शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:18 IST

जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.

पुणे : स्त्रिया आणि दलित हे समाजातील दोन्ही प्रवाह नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांचा आवाजही कायम दाबला गेलेला आहे. नितीन आगेचे खून प्रकरण त्या मानसिकतेतूनच घडले आहे. जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.लोकायत, पुणे जिल्हा मोलकरीण संघटना, श्रमिक महिला मोर्चा, मासूम, युवक क्रांती दल, मिळून सार्‍याजणी, नारी समता मंचया समविचारी संघटनांच्यावतीने खर्डा येथील जातीय अत्याचारविरोधी घटनेच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेधा थत्ते, सुनीती सु. र., अतुल पेठे, मारूती भापकर, अन्वर राजन, मुकुंद किर्दत, नीरज जैन, मकरंद साठे उपस्थित होते. पुन्हा पुन्हा अशा सभा घेण्याची वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणार्‍या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी साक्ष देण्यासाठी पुढे यावे असे विद्या बाळ यांनी स्पष्ट केले.मारूती भापकर म्हणाले, 'दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर लाखोंच्या संख्येने तरूण-तरूणींनी पुढे येऊन प्रशासनाला घाम फोडला होता. त्याप्रमाणे आताही जातीवादाच्या विरोधात तरूण-तरूणींनी मोठया संख्येने एकत्र यावे. आता खेडयांकडे जाऊन लोकांमध्ये फुले व आंबेडकरांचे विचार रूजविण्याची आवश्यकता आहे.'नितीन आगे याच्या खूनानंतर प्रस्थापित व्यवस्थेने बाळगलेलं मौन सर्वाधिक त्रासदायक आहे. जातीचे किल्ले पाडायला आता सर्वांनी सिध्द झाले पाहिजे असे सुनिती सु. र. यांनी सांगितले. अतुल पेठे म्हणाले, 'फँ ड्री जिथे संपते तिथे नितीन आगेचे प्रकरण पुढ सुरू होते. २०१४ च्या वर्षात घडलेल्या या घटनेमुळ शरमेने मान खाली जाते आहे. या घटनेने दलितांबरोबरच मुलींनाही एक इशारा दिला गेला आहे. स्वत:च्या मर्जीने कुठल्याही तरूणाच प्रेमात पडाल तर तुमची अवस्था अशी होईल असा गर्भित अर्थ यामध्ये सामावलेला आहे.'पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अन्वर राजन यांनी स्पष्ट केले. लेखक व साहित्यिकांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असल्याचे मकरंद साठे यांनी सांगितले.