शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कॉमन सर्व्हिस सेंटर्स फेब्रुवारीपासून बंदच!

By admin | Updated: June 30, 2017 01:20 IST

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत.

डॉ. खुशालचंद बाहेती। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत. पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमधून ही सेंटर्स सुरू करण्यात आलेली आहेत. डिजिटल इंडियाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील १० हजार ४७३ व शहरी भागांतील १ हजार ३३६ सेंटर्स सुरू करण्यात आली; परंतु या सेंटर्सवर आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र वगळता अन्य सेवा फेब्रुवारीपासूनच बंद पडल्या आहेत. त्यामुळे गैरसोयी दूर होण्याऐवजी त्या वाढल्या आहेत. ही सेंटर्स बंद पडण्यामागे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत असल्याचे कारण सांगितले जात आहे. तब्बल पाच महिने उलटूनही ही सेंटर्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नसतील, तर आता ‘डिजिटल इंडिया’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय सेवा सुलभ रीतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कॉमन सर्व्हिस सेंटर्सची निर्मिती करण्यात आली. विशेषत: इंटरनेट व ई-बँकिंग सेवा ज्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्यांना या सेंटर्सवर जाऊन या सेवा उपलब्ध करून घेण्याची सोय आहे. विजेचे बिल भरणे, परिवहन विभागातील वाहनांची नोंदणी करणे, चालक परवाना मिळवणे यासह शासनाच्या विविध विभागांतील परवाने मिळण्यासाठी अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, विविध कामांच्या निविदा भरणे ही कामे या सेंटर्सवरून व्हावीत, अशी संकल्पना आहे. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये ज्या सुविधांसाठी रोख रक्कम स्वीकारण्यात येत नाही, त्यासाठी या सर्व्हिस सेंटर्सवर रोख रक्कम स्वीकारून ती सेंटर्सच्या खात्यातून शासनाकडे जमा करते. या बदल्यात कॉमन सर्व्हिस सेंटर प्रत्येक सेवेसाठी शासकीय रकमेव्यतिरिक्त२० रुपये आकारू शकते व तशी पावती द्यावी लागते. खरेतर यातून रोजगारही उपलब्ध व्हावा, असा हेतू आहे; पण सेंटर्सच बंद असल्याने रोजगार निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.