शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कॉमन सर्व्हिस सेंटर्स फेब्रुवारीपासून बंदच!

By admin | Updated: June 30, 2017 01:20 IST

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत.

डॉ. खुशालचंद बाहेती। लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत. पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमधून ही सेंटर्स सुरू करण्यात आलेली आहेत. डिजिटल इंडियाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील १० हजार ४७३ व शहरी भागांतील १ हजार ३३६ सेंटर्स सुरू करण्यात आली; परंतु या सेंटर्सवर आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र वगळता अन्य सेवा फेब्रुवारीपासूनच बंद पडल्या आहेत. त्यामुळे गैरसोयी दूर होण्याऐवजी त्या वाढल्या आहेत. ही सेंटर्स बंद पडण्यामागे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत असल्याचे कारण सांगितले जात आहे. तब्बल पाच महिने उलटूनही ही सेंटर्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नसतील, तर आता ‘डिजिटल इंडिया’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय सेवा सुलभ रीतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कॉमन सर्व्हिस सेंटर्सची निर्मिती करण्यात आली. विशेषत: इंटरनेट व ई-बँकिंग सेवा ज्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, त्यांना या सेंटर्सवर जाऊन या सेवा उपलब्ध करून घेण्याची सोय आहे. विजेचे बिल भरणे, परिवहन विभागातील वाहनांची नोंदणी करणे, चालक परवाना मिळवणे यासह शासनाच्या विविध विभागांतील परवाने मिळण्यासाठी अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, विविध कामांच्या निविदा भरणे ही कामे या सेंटर्सवरून व्हावीत, अशी संकल्पना आहे. याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये ज्या सुविधांसाठी रोख रक्कम स्वीकारण्यात येत नाही, त्यासाठी या सर्व्हिस सेंटर्सवर रोख रक्कम स्वीकारून ती सेंटर्सच्या खात्यातून शासनाकडे जमा करते. या बदल्यात कॉमन सर्व्हिस सेंटर प्रत्येक सेवेसाठी शासकीय रकमेव्यतिरिक्त२० रुपये आकारू शकते व तशी पावती द्यावी लागते. खरेतर यातून रोजगारही उपलब्ध व्हावा, असा हेतू आहे; पण सेंटर्सच बंद असल्याने रोजगार निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.