शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

जाट आरक्षणासाठी समिती !

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला

नवी दिल्ली : जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंक अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. मी हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करीत आहे, असे राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केले.दरम्यान हरियाणा विधानसभेत पुढील अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची घोषणा भाजपचे नेते आणि प्रभारी सरचिटणीस अनिल जैन यांनी केली आहे.गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते. ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याच्या नेतृत्वात स्थापन होणारी समिती जाट समुदायाच्या मागण्यांवर विचार करेल, अशी माहिती जैन यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)अन्य राज्यांमध्येही लोणहरियाणात पेटलेल्या आरक्षण आंदोलनाची धग कायम असतानाच रविवारी नव्याने हिंसाचाराची भर पडली. हरियाणातील झज्जर, रोहतक आणि कैथाल या तीन जिल्'ांमधील उलाढाली ठप्प पडल्यामुळे व्यापारजगताचे २० हजार कोटींच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. उत्तर प्रदेश, राजस्थानसह दिल्लीतही या आंदोलनाचे लोण पसरले आहे. हरियाणात लागोपाठ आठव्या दिवशी हिंसाचार सुरूच असून नऊ शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये जाट समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध खाप पंचायतींच्या नेत्यांनी ‘रास्ता रोको’ केल्यामुळे उत्तर प्रदेश- हरियाणा सीमेवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जाट आंदोलनाचे लोण दिल्लीत पसरताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी शाळांना सुटी घोषित केली आहे. हरियाणातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे दिल्लीकरांच्या गैरसोयीत भर पडली. शांततेचे आवाहन...... यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घ्या, शांतता राखा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बलयान, भाजपचे खा. सत्यपालसिंग, हरियाणाचे मंत्री अभिमन्यू यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. जाट समुदायाने सरकारसोबत चर्चेसाठी समिती स्थापन करावी, असे हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी स्पष्ट केले.२० हजार कोटींचा फटकाजाट आंदोलनामुळे व्यापार, वाहतूक ठप्प पडल्याने उद्योगजगताचे अंदाजे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा असोचॅम या उद्योग आणि वाणिज्य संघटनेने केला आहे. खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचेही मोठे नुकसान झाले.हरियाणाच्या सीमा दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला लागून असल्यामुळे या राज्यांमधील आर्थिक व्यवहार प्रभावित झाले. बस, खासगी वाहने , रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे, मॉल आणि अनेक हॉटेलची जाळपोळ करण्यात आल्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेने नमूद केले. हरियाणाच्या बहुतांश जिल्'ांमध्ये वाहतुकीसह व्यापार उलाढाली पूर्णपणे ठप्प आहेत. संचारबंदी लागू असलेल्या जिल्'ांमध्ये उद्योगाचे सर्वाधिक नुकसान झाले.