शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

जाट आरक्षणासाठी समिती !

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला

नवी दिल्ली : जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंक अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. मी हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करीत आहे, असे राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केले.दरम्यान हरियाणा विधानसभेत पुढील अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची घोषणा भाजपचे नेते आणि प्रभारी सरचिटणीस अनिल जैन यांनी केली आहे.गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते. ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याच्या नेतृत्वात स्थापन होणारी समिती जाट समुदायाच्या मागण्यांवर विचार करेल, अशी माहिती जैन यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)अन्य राज्यांमध्येही लोणहरियाणात पेटलेल्या आरक्षण आंदोलनाची धग कायम असतानाच रविवारी नव्याने हिंसाचाराची भर पडली. हरियाणातील झज्जर, रोहतक आणि कैथाल या तीन जिल्'ांमधील उलाढाली ठप्प पडल्यामुळे व्यापारजगताचे २० हजार कोटींच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. उत्तर प्रदेश, राजस्थानसह दिल्लीतही या आंदोलनाचे लोण पसरले आहे. हरियाणात लागोपाठ आठव्या दिवशी हिंसाचार सुरूच असून नऊ शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये जाट समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध खाप पंचायतींच्या नेत्यांनी ‘रास्ता रोको’ केल्यामुळे उत्तर प्रदेश- हरियाणा सीमेवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जाट आंदोलनाचे लोण दिल्लीत पसरताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी शाळांना सुटी घोषित केली आहे. हरियाणातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे दिल्लीकरांच्या गैरसोयीत भर पडली. शांततेचे आवाहन...... यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घ्या, शांतता राखा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बलयान, भाजपचे खा. सत्यपालसिंग, हरियाणाचे मंत्री अभिमन्यू यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. जाट समुदायाने सरकारसोबत चर्चेसाठी समिती स्थापन करावी, असे हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी स्पष्ट केले.२० हजार कोटींचा फटकाजाट आंदोलनामुळे व्यापार, वाहतूक ठप्प पडल्याने उद्योगजगताचे अंदाजे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा असोचॅम या उद्योग आणि वाणिज्य संघटनेने केला आहे. खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचेही मोठे नुकसान झाले.हरियाणाच्या सीमा दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला लागून असल्यामुळे या राज्यांमधील आर्थिक व्यवहार प्रभावित झाले. बस, खासगी वाहने , रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे, मॉल आणि अनेक हॉटेलची जाळपोळ करण्यात आल्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेने नमूद केले. हरियाणाच्या बहुतांश जिल्'ांमध्ये वाहतुकीसह व्यापार उलाढाली पूर्णपणे ठप्प आहेत. संचारबंदी लागू असलेल्या जिल्'ांमध्ये उद्योगाचे सर्वाधिक नुकसान झाले.