शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी दबावापोटी तक्रार करण्याची केली घाई गोलाणी प्रकरण : मनपाच्या समितीने केली होती विशेष लेखापरिक्षणाची शिफारस

By admin | Updated: February 28, 2016 22:32 IST

जळगाव : गोलाणी प्रकरणी मनपा आयुक्तांनी विशेष लेखापरिक्षण झालेले नसतानाही दबावापोटी पोलिसांत तक्रार देण्याची घाई गेल्याचे शासनाकडून मनपाला प्राप्त झालेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.

जळगाव : गोलाणी प्रकरणी मनपा आयुक्तांनी विशेष लेखापरिक्षण झालेले नसतानाही दबावापोटी पोलिसांत तक्रार देण्याची घाई गेल्याचे शासनाकडून मनपाला प्राप्त झालेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केवळ मनपाने (तत्कालीन नपाने) नगरविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मक्तेदाराला अदा केलेल्या रक्कमेच्या नोंदी रेकॉर्डवर नसल्याने मनपा आयुक्तांना त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेच आदेश दिलेले असताना आयुक्तांनी दबावाखाली मनपातील अधिकार्‍यांची समिती नेमून लेखा परिक्षण केल्याचे तसेच या समितीने देखील विशेष लेखापरिक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले असतानाही याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची घाई केल्याचे निदर्शनास आले आहे.
तत्कालीन न.पा.ने गोलाणी मार्केट बांधण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भाजी मार्केटवाले कोर्टात गेले होते. त्यावर सवार्ेच्च न्यायालयाने संपूर्ण मार्केट मक्तेदाराने बांधून त्याचे गाळे प्रिमीयम आकारून दीर्घ मुदतीच्या कराराने द्यावे. त्यातून आलेल्या पैशांतून मनपाला सतरा मजली इमारत बांधून द्यावी. तर न.पा.ने या गाळ्यांमधील दुकानदारांकडून भाडे घ्यावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या दुसर्‍या, तिसर्‍या मजल्याचे बांधकाम झाले. मात्र चौथ्या व पाचव्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी गाळ्यांना गिर्‍हाईक मिळत नसल्याने मक्तेदाराने तत्कालीन नपाकडे अर्ज देऊन गाळे नपानेच विकत घ्यावे व मक्तेदाराला पैसे द्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे १९९०-९५ मध्ये तत्कालीन न.पा.ने याबाबत ठराव करून ठेकेदाराला पेमेंट केले होते. त्याविरोधात तत्कालीन नगरसेवक छबिलदास खडके, नरेंद्र पाटील यांच्यासह १६-१७ नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. त्यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांनी ठरावाला स्थगिती दिली होती. मात्र नगरविकास राज्यमंत्र्यांनी या ठरावावरील स्थगिती उठविली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील याबाबतची याचिका फेटाळल्याने तक्रारदारांनी सवार्ेच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशावरून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याकेसची फेरसुनावणी सुरू आहे. त्यात राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मक्तेदाराला मनपाने किती रक्कम अदा केली? ते रेकॉर्डवर नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने आयुक्तांना त्याबाबत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश केले होते, मात्र आयुक्तांनी याप्रकरणात दबावापोटी आवश्यकता नसतानाही मनपातील अधिकार्‍यांची समिती नेमून लेखापरिक्षण केले. या समितीने थेट विरोध करणे शक्य नसले तरीही अहवालात याप्रकरणी विशेष लेखापरिक्षण होणे गरजेचे असल्याचा शेराही मारला होता. असे असतानाही आयुक्तांनी फिर्याद देण्याची घाई केली. मात्र पोलिसांनी किती रक्कमेचा व कसा अपहार झाला? याची विचारणा केल्यानंतर विशेष लेखापरिक्षण होणे आवश्यक असल्याची बाब स्पष्ट झाली.