शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

आयोगाचे चुकले! गुजरात राज्यसभा निवडणुकीचा निकाल वादग्रस्त ठरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:07 IST

गुजरात विधानसभेतून राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राघवजीभाई पटेल आणि भोलाभाई गोहिल या काँग्रेस आमदारांनी दिलेली मते मोजणीपूर्वी बाजूला काढून ठेवण्याचा निवडणूक आयोगाने मंगळवारी दिलेला निकाल वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

- अजित गोगटे गुजरात विधानसभेतून राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राघवजीभाई पटेल आणि भोलाभाई गोहिल या काँग्रेस आमदारांनी दिलेली मते मोजणीपूर्वी बाजूला काढून ठेवण्याचा निवडणूक आयोगाने मंगळवारी दिलेला निकाल वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. भाजपाने याविरुद्ध न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत.पटेल व गोहिल यांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका मतपेटीत टाकण्यापूर्वी त्या त्यांच्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीलाच दाखविणे नियमांनुसार बंधनकारक होते. अशी मतपत्रिका मतदाराने अन्य कोणाला दाखविली किंवा इतर कोणी ती पाहिली तर निवडणूक अधिकाºयांनी ती परत घ्यावी आणि तिच्या मागे ‘नियमाचे उल्लंघन करून दिलेले मत’, असा शेरा मारून वेगळ्या लिफाफ्यात ठेवावी, असे नियम सांगतो. पटेल व गोहिल यांनी त्यांची मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत भाजपाच्या नेत्यांनाही दाखविली, हे व्हिडीओ रेकॉर्डिंगवरून स्पष्ट दिसते. म्हणजेच, या दोघांनी नियमाचे उल्लंघन केले. मात्र, निवडणूक अधिकाºयाने नियमाचे पालन केले नाही. पटेल आणि गोहिल यांच्याकडून मतपत्रिका परत घेऊन त्या वेगळ््या ठेवण्याऐवजी त्यांनी त्या मतपत्रिका मतपेटीत टाकू दिल्या.हा प्रकार घडला, तेव्हा काँग्रेसने आक्षेप घेतला नाही. मतदान संपल्यानंतर काँग्रेसने अधिकाºयांकडे अर्ज दिला व ती मते रद्द करण्याची मागणी केली. अधिकाºयांनी या घटनाक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहिले व काँग्रेसची मागणी अमान्य केली. नियमानुसार निवडणूक अधिकाºयांना मतदान पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल आयोगाकडे पाठवून मतमोजणी सुरू करण्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. निवडणूक आयोगाने मतमोजणीची परवानगी मागण्यासाठी आपला अहवाल आयोगाकडे पाठविला व त्यात पटेल व गोहिल यांच्या मतांवरून झालेल्या वादाचा तपशील देऊन त्यांची मते रद्द करण्याची काँग्रेसची मागणी आपण अमान्य केली असल्याचेही कळविले.मतमोजणी सुरू करण्याची परवानगी द्यायची की नाही, यावर आयोग विचार करत असतानाच काँग्रेस व भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांची शिष्टमंडळे अनेकदा भेटली व त्यांनी आपापली बाजू मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती व निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पटेल व गोहिल यांच्या मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग मागवून घेतले आणि पाहिले.आयोगाने हा निर्णय देताना राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर केला. स्वतंत्र आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व पावले उचलण्याचा अधिकार याद्वारे आयोगास आहे. शिवाय आयोगाने कुलदीप नय्यर वि. भारत सरकार आणि मोहिंदर सिंग गिल वि. भारत सरकार या दोन प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचेही दाखले दिले.पटेल व गोहिल यांची नियमबाह्य मते वेळीच बाजूला काढली जायला हवी होती; पण तसे न करून निवडणूक अधिकाºयाने चूक केली, याविषयी वाद नाही. मतमोजणीस परवानगी देण्याच्या प्रक्रियेत आयोग ही चूक सुधारू शकते का? हा खरा प्रश्न आहे. कायद्यानुसार निवडणुकीच्या बाबतीत निवडणूक अधिकाºयाचा निर्णय अंतिम असतो व त्यास फक्त न्यायालयातच आव्हान दिले जाऊ शकते. निवडणूक अधिकाºयाच्या निर्णयाविरुद्ध आयोगाकडे अपील करण्याची सोय नाही. तरीही अनुच्छेद ३२४चा आधार घेऊन आयोग हा अपिलाचा अधिकार घेऊ शकते का? हा खरा वादाचा मुद्दा आहे. अहमद पटेल यांच्या निवडीस दोन नियमबाह्य मतांच्या आधारे आव्हान देऊन ती निवडणूक न्यायालयाकडून रद्द करून घेणे, हा कायदेशीर पर्याय आहे.कवित्व संपले नाहीनिवडणूक अधिकारी हा आयोगाचाच प्रतिनिधी असतो. त्याचा निर्णय आयोगाने रद्द करणे म्हणजे आयोगाने आपल्याच निर्णयाविरुद्ध अपिलाचा निर्णय घेणे आहे.त्यामुळे अहमद पटेल यांच्या निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही व हा वाद न्यायालयात लढला जाईल हे निश्चित. पटेल यांनी सहा वर्षांची मुदत संपण्याआधी न्यायालयाने याचा सोक्षमोक्ष लावला, म्हणजे मिळविली!