शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राजकीय विधानामुळे लष्करप्रमुखांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 05:35 IST

ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ

नवी दिल्ली : ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ याविषयी केलेल्या विधानांबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर गुरुवारी चौफेर टीका झाली. लष्कराने मात्र जनरल रावत यांच्या वक्तव्यांत राजकीय अभिनिवेश नव्हता, असे म्हणून त्यांचे समर्थन केले.दिल्लीतील डीआरडीओ भवनात बुधवारी झालेल्या एका परिसंवादात जनरल रावत यांना आसामच्या काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी मुस्लिमांची लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले. एवढेच नव्हेतर, या घुसखोरीच्या जोरावर तेथे ‘आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एआययूडीएफ)सारखा मुस्लीमधार्जिणा राजकीय पक्ष झपाट्याने फोफावत असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.एकेकाळी केवळ दोन खासदार असलेल्या जनसंघातून उभा राहिलेला भाजपा आज आपल्याला एवढा मोठा झालेला दिसतो. पण ‘एआययूडीएफ’ची वाढ याहूनही थक्क करणारी आहे, असेही जनरल रावत म्हणाले होते. ‘एआययूडीएफ’चे आज आसाममध्ये १३ आमदार असून, लोकसभेवर पक्षातर्फे तीन जण निवडून गेले आहेत.लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यास जोरदार आक्षेप घेत ‘एआययूडीएफ’चे प्रमुख व खा. मोहम्मद बद्रुद्दिन अजमल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, जनरल रावत यांनी राजकीय विधान करावे हे धक्कादायक आहे. लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित एखादा राजकीय पक्ष भाजपापेक्षा अधिक वेगाने वाढत असेल तर त्याची लष्करप्रमुखांना चिंता वाटण्याचे कारण काय? प्रस्थापित मोठ्या पक्षांच्या कुशासनामुळे ‘आप’ आणि ‘एआययूडीएफ’सारखे पक्ष वाढत आहेत. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही टॅग केले आहे.‘आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खा. असाउद्दिन ओवेसी यांनीही लष्कर प्रमुखांनी राजकीय विषयात नाक न खुपसता आपले काम करावे, असे सुचविले आहे. टिष्ट्वटमध्ये ओवेसी यांनी लिहिले की, जनरल रावत यांनी अशी विधाने करावीत, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी राजकीय बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये. राजकीय पक्षांच्या वाढीवर भाष्य करणे हे त्यांचे काम नाही. लोकशाहीत व राज्यघटनेनुसार राजकीय पक्षांना काम करण्याची मुभा आहे. लोकांनी निवडून दिलेल्या राजकीय नेतृत्वाच्या हाताखाली काम करणे एवढेच लष्कराचे काम आहे.आसाममध्ये मुस्लिमांचे स्थलांतर नवे नाही. फार पूर्वीपासून अहोम वंशाच्या लोकांप्रमाणेच मुस्लीम तिथे येत राहिले आहेत. आसामच्या आठ जिल्ह्यांत मुस्लीम बहुसंख्य झाले आहेत. फरक एवढाच आहे की, आता होत असलेल्या घुसखोरीला पूर्वेकडील (बांगलादेश) व उत्तरेकडील (चीन) शेजाºयांची फूस आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल. लोकसंख्येचे चित्र बदलणे शक्य नसले तरी बाहेरून येणाºया या लोकांना समरस करून घेणे हे मोठे आव्हान आहे, असेही जनरल रावत यांचे म्हणणे होते.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत